शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

खनिज व्यवसाय पुन्हा सुरु होण्याच्या संकेताने खाणपट्ट्यामध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 21:29 IST

गोव्यातील चौगुले खाण कंपनीने उत्खनन करुन ठेवलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव: रॉयल्टी भरलेला पण तरीही गोव्यातील खाणींवर पडून राहिलेल्या खनिज मालाच्या वाहतुकीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने दक्षिण गोव्यातील खाण पट्टय़ात पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. गोव्यात बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांना मिळालेला न्याय अशा शद्बात दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे तर ही वाहतूक चालू असतानाच गोवा सरकारने स्वत:चे खनिज महामंडळ स्थापन करुन ताबडतोब हा व्यवसाय सुरु करावा अशी मागणी खाण पट्टय़ातील मंत्री दीपक पाऊसकर यांनी केली आहे.

गोव्यातील चौगुले खाण कंपनीने उत्खनन करुन ठेवलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविताना सहा महिन्याच्या कालावधीत मालाची वाहतूक करा असे निर्देश दिले आहेत. आतार्पयत रॉयल्टी भरलेला 9 हजार दशलक्ष टनापेक्षा अधिक माल वेगवेगळ्या खाणींच्या आवारात पडून आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले, मागची दोन तीन वर्षे खनिज व्यवसाय पूर्णत: बंद झाल्याने खाण पट्टय़ाला जणू लकवा मारला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा आशेचा किरण दिसू लागला आहे. सध्या गोवा सरकारची या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झाली आहे. अन्य कायदेशीर मार्गातूनही हा बंद पडलेला व्यवसाय सुरु व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निवाडय़ामुळे आता या सर्व प्रक्रियेला गती येईल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

सावर्डेचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी या निर्णयाचे स्वागत करताना, यामुळे किमान वर्षभर तरी खाण पट्टय़ाला दिलासा मिळणार आहे. हे काम चालू असतानाच राज्य सरकारने डंप पॉलिसी तयार करण्याबरोबरच स्वत:चे खनिज महामंडळ स्थापन करुन हा व्यवसाय पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

सावर्डेचे माजी सरपंच व विद्यमान पंच संजय नाईक यांनी या निर्णयामुळे खाण पट्टय़ाला दिलासा मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या कामगारांना खाण कंपन्यांनी कामावरुन कमी केले आहे त्यांना पुन्हा काम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे मत व्यक्त केले. तर ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई यांनी सध्या जो खनिजमाल पडून आहे तो पाहिल्यास निदान दीड वर्ष तरी ट्रकांना वाहतुकीचे काम मिळेल. असे जरी असले तरी गोवा सरकारने आताच भविष्याची पाऊले ओळखून एक तर खाणीचा लिलाव करण्यासाठी किंवा स्वत:चे महामंडळ स्थापण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी केली.

मायनिंग डिपेंडेंटचे पुती गावकर यांनी सध्याच्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल एक चांगला संकेत असे वाटते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करणो सोयीस्कर ठरेल असे मत व्यक्त केले. 

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाgoaगोवा