शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खाणींना नवेच ‘ईसी’!

By admin | Updated: February 3, 2015 01:33 IST

पणजी : राज्यातील सर्व खनिज लिजधारकांना पर्यावरणविषयक दाखले (ईसी) मिळविण्यासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहेत, अशी माहिती मिळाली.

पणजी : राज्यातील सर्व खनिज लिजधारकांना पर्यावरणविषयक दाखले (ईसी) मिळविण्यासाठी नव्याने अर्ज करावे लागणार आहेत, अशी माहिती मिळाली. यामुळे राज्यातील खनिज व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत गोवा सरकारने ८४ खनिज लिजांचे नूतनीकरण करून दिले असून ४३ खाण लिजांचे करार झाले आहेत. या सर्व खनिज खाणी सुरू होण्यासाठी त्यांना पर्यावरणविषयक दाखले मिळणे गरजेचे आहे. यापूर्वीचे सगळे दाखले केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने निलंबित केलेले आहेत. जयंती नटराजन त्या वेळी पर्यावरणमंत्री होत्या. आता प्रकाश जावडेकर हे पर्यावरणमंत्री असून, निलंबित झालेले दाखले आहेत त्याच स्थितीत काढून खनिज व्यावसायिकांना देता येणार नाहीत, असे त्यांनी अनौपचारिकपणे गोवा सरकारमधील मंडळींना सांगितले असल्याची माहिती मिळाली आहे. गोव्यातील खाण व्यावसायिकांनाही तशीच माहिती मिळाली असल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. नव्याने ईसींसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्येक लिजबाबत जनसुनावणी घ्यावी लागेल. त्यानंतरच ईसी द्यावी की नाही, याचा निर्णय घेता येईल. सप्टेंबर २०१२ मध्ये निलंबित करण्यात आलेल्या पर्यावरणविषयक दाखल्यांबाबतचा निलंबन आदेश मागे घेतला जावा, अशी मागणी खाण व्यावसायिक करत होते. गोवा सरकारनेही ही मागणी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडे यापूर्वी पोहोचविली आहे; पण या सगळ्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष असल्याने निलंबनाचा आदेश सरकार मागे घेऊ शकत नाही. निलंबनाचा आदेश मागे घेणे हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अशी भूमिका केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतल्याचे कळते. गोवा सरकारने सप्टेंबर २०१२ मध्ये खाणबंदीचा आदेश लागू केला होता. गेल्या महिन्यात दोन वर्षांनंतर सरकारने हा आदेश मागे घेतला. त्याच धर्तीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही ईसी निलंबनाचा आदेश मागे घ्यावा, अशी गोवा सरकारची अपेक्षा होती. (खास प्रतिनिधी)