शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

खनिजखाणप्रश्नी हस्तक्षेप याचिका, सरकारची नवी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 20:08 IST

राज्यातील खनिज खाणप्रश्नी फेरविचार याचिका सादर करण्याचा मुद्दा सरकारने आता सोडून दिला आहे. त्याऐवजी हस्तक्षेप याचिका (आयए) सादर केली जाईल. भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांनी तशा अर्थाचे विधान मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.

पणजी : राज्यातील खनिज खाणप्रश्नी फेरविचार याचिका सादर करण्याचा मुद्दा सरकारने आता सोडून दिला आहे. त्याऐवजी हस्तक्षेप याचिका (आयए) सादर केली जाईल. भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांनी तशा अर्थाचे विधान मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. याचाच अर्थ अध्यादेश जारी करण्याचा विषयही सध्या सरकारसमोर नाही हे स्पष्ट होत आहे.

राज्यातील खाण अवलंबितांकडून आझाद मैदानावर आंदोलन केले जात असल्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारताच काब्राल म्हणाले, की खाणप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत. मी स्वत: चारवेळा याविषयी पाठपुराव्यासाठी दिल्लीला जाऊन आलो. पंतप्रधानांच्या कार्यालयाने गोव्यातील खाणप्रश्न गंभीरपणो विचारात घेतला आहे. मुख्यमंत्री गोव्यात परतल्यानंतर या विषयाला वेग मिळेल.

काब्राल म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 7 फेब्रुवारी रोजी बंदीचा आदेश लागू केल्यानंतर त्या आदेशाचा फेरविचार करावा अशी याचिका आता सादर केली जाणार नाही. त्याऐवजी हस्तक्षेप याचिका राज्य सरकार सादर करील व केंद्र सरकारचा पाठींबा घेतला जाईल. हस्तक्षेप याचिकेतून आता यापुढे काय करावे याविषयी न्यायालयाचे मार्गदर्शन घेतले जाईल. खाणी बंद झाल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला व अनेकांना रोजगार संधीस मुकावे लागले ही स्थिती न्यायालयासमोर ठेवून यापुढे काय करता येईल, खाणी कशा सुरू करता येईल असे मुद्दे घेऊन न्यायालयाचा सल्ला मागितला जाईल.

काब्राल म्हणाले, की अध्यादेश जारी करणो हा सध्या विषय नाही, कारण न्यायालयाला विश्वासात घेऊनच काय ते ठरवावे लागेल. जर अध्यादेश जारी केला व त्यास कुणी एनजीओने न्यायालयात आव्हान दिले तर पुन्हा समस्या निर्माण होईल. त्यामुळे अध्यादेश जारी करण्यापूर्वी हस्तक्षेप याचिका सादर करावी. न्यायालयात विश्वासात घेऊन पाऊले टाकणे योग्य ठरेल.

दरम्यान, गोवा भेटीवर येऊन गेलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मंगळवारी पत्रकारांना सांगितले, की खनिज खाणप्रश्नी केंद्र सरकार न्यायालयात जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाशी आमची बोलणी झाली आहेत.

टॅग्स :goaगोवा