शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

खनिजखाणप्रश्नी हस्तक्षेप याचिका, सरकारची नवी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 20:08 IST

राज्यातील खनिज खाणप्रश्नी फेरविचार याचिका सादर करण्याचा मुद्दा सरकारने आता सोडून दिला आहे. त्याऐवजी हस्तक्षेप याचिका (आयए) सादर केली जाईल. भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांनी तशा अर्थाचे विधान मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले.

पणजी : राज्यातील खनिज खाणप्रश्नी फेरविचार याचिका सादर करण्याचा मुद्दा सरकारने आता सोडून दिला आहे. त्याऐवजी हस्तक्षेप याचिका (आयए) सादर केली जाईल. भाजपाचे आमदार निलेश काब्राल यांनी तशा अर्थाचे विधान मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. याचाच अर्थ अध्यादेश जारी करण्याचा विषयही सध्या सरकारसमोर नाही हे स्पष्ट होत आहे.

राज्यातील खाण अवलंबितांकडून आझाद मैदानावर आंदोलन केले जात असल्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारताच काब्राल म्हणाले, की खाणप्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत. मी स्वत: चारवेळा याविषयी पाठपुराव्यासाठी दिल्लीला जाऊन आलो. पंतप्रधानांच्या कार्यालयाने गोव्यातील खाणप्रश्न गंभीरपणो विचारात घेतला आहे. मुख्यमंत्री गोव्यात परतल्यानंतर या विषयाला वेग मिळेल.

काब्राल म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 7 फेब्रुवारी रोजी बंदीचा आदेश लागू केल्यानंतर त्या आदेशाचा फेरविचार करावा अशी याचिका आता सादर केली जाणार नाही. त्याऐवजी हस्तक्षेप याचिका राज्य सरकार सादर करील व केंद्र सरकारचा पाठींबा घेतला जाईल. हस्तक्षेप याचिकेतून आता यापुढे काय करावे याविषयी न्यायालयाचे मार्गदर्शन घेतले जाईल. खाणी बंद झाल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला व अनेकांना रोजगार संधीस मुकावे लागले ही स्थिती न्यायालयासमोर ठेवून यापुढे काय करता येईल, खाणी कशा सुरू करता येईल असे मुद्दे घेऊन न्यायालयाचा सल्ला मागितला जाईल.

काब्राल म्हणाले, की अध्यादेश जारी करणो हा सध्या विषय नाही, कारण न्यायालयाला विश्वासात घेऊनच काय ते ठरवावे लागेल. जर अध्यादेश जारी केला व त्यास कुणी एनजीओने न्यायालयात आव्हान दिले तर पुन्हा समस्या निर्माण होईल. त्यामुळे अध्यादेश जारी करण्यापूर्वी हस्तक्षेप याचिका सादर करावी. न्यायालयात विश्वासात घेऊन पाऊले टाकणे योग्य ठरेल.

दरम्यान, गोवा भेटीवर येऊन गेलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मंगळवारी पत्रकारांना सांगितले, की खनिज खाणप्रश्नी केंद्र सरकार न्यायालयात जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाशी आमची बोलणी झाली आहेत.

टॅग्स :goaगोवा