शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोव्यातील खनिज घोटाळा : गोठविलेली लूट जप्त करण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 13:12 IST

खनिज घोटाळा प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून बराच जोर धरला असून लुटीची रक्कम गोठवण्याची कारवाईही एसआयटीकडून करण्यात आली आहे. 

पणजी : खनिज घोटाळा प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून बराच जोर धरला असून लुटीची रक्कम गोठवण्याची कारवाईही एसआयटीकडून करण्यात आली आहे. परंतु गोठविण्यात आलेले ६० कोटी रुपये जप्त करण्याच्या बाबतीतच एसआयटीची खरी कसोटी आहे. त्यावरच या प्रकरणातील तपासाचे यश व अपयश अवलंबून आहे. 

बेकायदेशीरपणे खनिजाची ट्रेडिंग करणारा इम्रान खान याच्या बँकेतील एकूण १०० कोटी रुपयांच्या कायम ठेवी गोठवण्याची सूचना एसआयटीकडून बँकांना करण्यात आल्यानंतर आतापर्यंत दोन टप्प्यात मिळून ६० कोटी रुपये गोठविण्यात आले आहेत. हे ६० कोटी रुपये केवळ गोठविण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेले नाहीत. म्हणजेच इम्रान खान हे पैसे केवळ काढू शकत नाही,  तसेच  त्या बाबतीत कोणताही व्यवहार करू शकत नाही. परंतु अद्याप या पैशांचा मालकी हक्क त्याच्याकडेच आहेत. केवळ तपासात अडकल्यामुळे त्याच्या कामी पैसा तूर्त येवू शकत नाही. परंतु ही स्थिती केवळ तात्पुरती आहे. जप्त करण्यात आलेले पैसे हे बेकायदेशीर खनिज उद्योगातूनच मिळविण्यात आले आणि राज्याच्या तिजोरीला फटका देऊन उभारण्यात आले हे सिद्ध झाल्याशिवाय हे पैसे जप्त करणे एसआयटीला शक्य होणार नाही. त्यामुळे एसआयटीचे खरे काम आताच सुरू होत आहे. 

एसआयटीचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणातील तपासाने वेग निश्चित घेतला आहे. खाण मालकांना आणि नावे गुप्त ठेवलेल्या मोठ्या ट्रेडरनाही समन्स जाऊ लागले आहेत. कोट्यवधी रुपयांची लूट करणा-या आणि मोठ्या राजकारण्यांशी संबंध ठेऊन हा घोटाळा केला अशा ट्रेडरनाही अटक करण्याचे धाडस दाखविण्यात आले. इतके सारे असले तरी न्यायालयाचा निवाडा हा पुरावे आणि साक्षींवर अवलंबून असतो.

परिस्थितीजन्य पुरावे उभे करण्यासही मर्यादा या असतात. कागदोपत्री पुरावे हे लुटणा-या माणसापेक्षा किती लूट झाली याची माहिती अधिक देत आहेत. मोठा साक्षीदार म्हणून खाण खात्याचे माजी संचालक जे बी भिंगी हे एक मोठे नाव एसआयटीच्याबाजूने सध्या आहे. तेवढ्यावर काही भागणार नाही याची जाणीवही एसआयटीला आहे. ज्यांना सशयित म्हणून एसआयटीकडून समन्स पाठविण्यात आले ते काही साक्षीदार म्हणून एसआयटीला सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावणे हे एसआयटीसाठी मोठे आव्हान आहे. त्यापूर्वी या प्रकरणात आरोपपत्र ठेवणे हे ही एक तितक्याच महत्त्वाचे काम ठरणार आहे.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर