शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खनिज खाणी: गोवा सरकार 80 हजार कोटींना मुकले, कर्नाटकने 94 हजार कोटी कमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 19:52 IST

गोव्यातील खनिज खाणींच्या 88 लिजांचे नूतनीकरण गोवा सरकारने अगदी मोफत करून दिले व त्यामुळे सरकार व गोमंतकीय जनता किमान 80 हजार कोटी रुपयांच्या महसुलाला मुकली आहे.

पणजी : गोव्यातील खनिज खाणींच्या 88 लिजांचे नूतनीकरण गोवा सरकारने अगदी मोफत करून दिले व त्यामुळे सरकार व गोमंतकीय जनता किमान 80 हजार कोटी रुपयांच्या महसुलाला मुकली आहे. या उलट कर्नाटक सरकारने केवळ सात खनिज खाणींच्या लिजांचा लिलाव पुकारला आणि त्याद्वारे 94 हजार कोटींचा महसुल कमावला आहे, अशी आकडेवारीवजा माहिती गोवा फाऊंडेशनचे डॉ. क्लॉड अल्वारीस व इतरांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. गोवा सरकार सार्वजनिक संसाधने अगदी सहज काढून देत असून सरकारने खेळ मांडला असल्याची टीका अल्वारीस यांनी केली.

गोवा सरकारने खनिज खाणींचा लिलाव केला नाही. उलट शहा आयोगाने ज्या खाण कंपन्यांकडे बेकायदा खनिज व्यवसायाबाबत बोट दाखवले आहे, त्याच सहा-सात कंपन्यांना काढून सरकारने बहुतांश लिजेस दिली आहेत. शहा आयोगाने नमूद केलेला 35 हजार कोटींचा आकडा हा चुकीचा नाही. केवळ लिज क्षेत्रबाहेरून जेवढा माल काढला गेला आहे, त्या मालाची किंमत पस्तीस हजार कोटी होत आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने दि. 21 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निवाडय़ाुसार नोव्हेंबर 2007 पासून सर्व खनिज लिजेस रद्दबातल ठरविल्या आहेत, असे क्लॉड यांनी सांगितले. देशातील सर्व खनिज लिजांचा लिलाव पुकारला जावा म्हणून केंद्र सरकारने खनिज कायद्यात दुरुस्ती केली. तथापि, केंद्राचा तो दुरुस्ती अध्यादेश जारी होत असल्याचे पाहून गोवा सरकारने घाईघाईत 88 लिजांचे नूतनीकरण करून टाकले. गोवा फाऊंडेशनने हे नूतनीकरण बेकायदा असल्याचे युक्तीवाद करत सर्वोच्च न्यायालयाला याचिका सादर केली. नुकतेच सलग तीन आठवडे या याचिकेवर व खनिजविषयक अन्य याचिकांवर सुनावणी झाली. हायकोर्टाच्या एका निवाडय़ालाही गोवा फाऊंडेशनने आव्हान दिले आहे. दोन्हीबाजूचे युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतले असून मंगळवारी निवाडा राखून ठेवला आहे. आम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत की नाही ते सर्वोच्च न्यायालय ठरवील. आम्हाला म्हणजेच गोव्याला न्याय मिळेल अशी आशा आहे, असे अल्वारीस म्हणाले.

एसआयटी आता पाच वर्षानंतर दिगंबर कामत यांच्या मागे लागली आहे. एसआयटीने एका देखील प्रकरणाचा तपास पूर्ण केलेला नाही. गोवा सरकारने त्याच ठराविक कंपन्यांना लिजेस मोफत दिल्या. नावापुरती थोडी स्टॅम्प डय़ुटी गोळा केली. जर सरकारने व्यवस्थित लिलाव केला असता तर केवळ 80 हजार कोटीच नव्हे तर 1 लाख 40 हजार कोटी रुपये गोव्याच्या तिजोरीत आले असते. आता हे पैसे फक्त काही खाण मालकांच्या खिशात आहेत. हा पैसा लोकांचा आहे. खाण खाते सध्या खनिज व्यवसायिकच चालवत आहेत. आम्ही आरटीआयखाली केलेल्या एकाही अर्जाला पाच वर्षात खाण खात्याने 

उत्तर दिले नाही. उत्तर देऊ नका, अशीच मुख्यमंत्री र्पीकर यांची खात्याला सूचना होती, असे अल्वारीस म्हणाले. खाण कंपन्यांनी 2007 नंतर गोव्यात जी प्रचंड लुट केली, त्याच्या वसुलीसाठी सरकारने काहीच केले नाही. 65 हजार कोटी रुपयांच्या वसुलीसाठी गोवा फाऊंडेशन उच्च न्यायालयात जाणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण खनिज कंपन्यांनी गोव्याचे पर्यावरण, जल ोत, शेती यांची अपरिमित हानी केली आहे. वेळगे व अन्य भागांतील लोक व शेतकरी आता आमच्याकडे येत आहेत. आम्हाला न्यायालयीन लढा देण्यासाठी मदत करा, अशी विनंती लोक करतात. जर वीसदशलक्ष टन खनिज मर्यादा असताना सोनशीमध्ये प्रचंड हानी होते तर मग 30 दशलक्ष टन मर्यादा करून दिली तर गोव्यात किती हानी केली जाईल याची कल्पना येते. त्यामुळेच वार्षिक खनिज उत्पादन मर्यादा कमी करण्याची विनंती आम्ही न्यायालयाला केली आहे. शक्य झाल्यास हे प्रमाण 5 दशलक्ष टनार्पयत खाली आणायला हवे, असे अल्वारीस म्हणाले.

वेदांता, फोमेन्तो, तिंबलो आदी कंपन्यांना सरकारने अधिक लिजांचे नूतनीकरण करून दिले आहे. जिल्हा मिरनल फंडामध्ये एकूण चारशे कोटी रुपये वीनावापर आहेत. हा पैसा खनिज खाणींमुळे ज्यांना झळ बसली, अशा लोकांच्या कल्याणासाठी वापरायला हवा. याऐवजी सरकार हा पैसा मायनिंग बायपास बांधण्यासाठी वापरू पाहत आहे. आम्ही यास विरोध करून याविरुद्धही हायकोर्टात जाणार आहोत. मायनिंग बायपास बांधण्यासाठी सरकारने खाण कंपन्यांकडून पैसे गोळा करावेत. मिनरल फंड हा खाणींवर अवलंबून असलेल्यांच्या किंवा खाण उद्योगाच्या हितासाठी नाही तर खाणींमुळे ज्यांची हानी झाली त्यांच्या कल्याणासाठी आहे,असे अल्वारीस म्हणाले.

--वेदांताला मिळाली 21 लिजेस

--जिल्हा मिनरल फंडमधून बायपास बांधण्यास विरोध

-- 65 हजार कोटींच्या वसुलीसाठी उच्च न्यायालयात जाणार

-- खाण कंपन्यांच्या मालमत्ता वसुलीसाठी ताब्यात घ्याव्यात

--गोव्याच्या पर्यावरणाची न भरून येणारी हानी

-- वेळगे व अन्य भागातील लोक आता फाऊंडेशनकडे मदतीसाठी येतात

--खाण खाते खनिज व्यवसायिकच चालवतात

टॅग्स :goaगोवा