शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईचे पाणी वाटप अटळ : मनोहर पर्रिकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 18:00 IST

म्हादई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणो हे अपरिहार्य व अटळ आहे

पणजी : म्हादई नदी केवळ गोव्यातूनच वाहत नाही तर ती कर्नाटक आणि महाराष्ट्रातून देखील वाहते. त्यामुळे म्हादई नदीच्या पाण्याचे गोवा व कर्नाटक यांच्यात वाटप होणो हे अपरिहार्य व अटळ आहे. लवादाच्या निवाडय़ात देखील तसेच अपेक्षित असू शकते. जर कुणाला पाणी वाटप शक्यच नाही असे वाटत असेल तर संबंधित व्यक्ती वेडय़ांच्या नंदनवनात वावरत आहेत असे म्हणावे लागेल असे सांगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी म्हादईप्रश्नी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्री र्पीकर यांना म्हादई पाणीप्रश्नी विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, की मी कर्नाटकला म्हादईप्रश्नी पत्र देताना गोव्याच्या हिताचा विचार केला आहे. माङो पत्र हे अतिशय योग्य आहे. काहीजण त्या पत्रमधील मजकुराच्या बाहेर जातात व विविध अर्थ लावतात. म्हादई नदीचा 35 किलोमीटरचा प्रवाह हा कर्नाटकमधून वाहतो. सोळा किलोमीटर महाराष्ट्रातून जातो आणि 52 किलोमीटर गोव्याहून जातो. ज्या जागेतून नदी जात असते, त्या जागेतील व्यक्तींना पाणी मिळणार नाही असे म्हणता येत नाही पण नदीचे पाणी दुस:या नदीमध्ये वळविता येणार नाही. कारण म्हादई नदीत पाणी कमी आहे. हाच विषय लवादासमोर आहे. म्हादई नदीचे पाणी वळवावे की नाही असा मुद्दा लवादासमोर असून आम्ही पाणी वळविण्यास विरोध केला, कारण म्हादईत पुरेसे पाणी नाही आणि 75 टक्के गोवा या पाण्यावर अवलंबून आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की नदीतील पाण्याचे वाटप हे होणारच आहे. ते अपरिहार्य आहे. ज्याला कायदा समजतो, त्याला तरी ते निश्चितच कळून येईल. लवादाच्या निवाडय़ात देखील म्हादईचे पाणी वाटप करावे असा निष्कर्ष असू शकतो. गोव्यातील ज्या 21 संस्था व संघटना म्हादईप्रश्नी सध्या संघटीत होऊन लढू पाहत आहेत, त्यातील बहुतेकजण हे नेहमीचेच कलाकार आहेत. त्यांनी आपल्याला म्हादईप्रश्नी एकही पत्र लिहिलेले नाही. त्यांनी लोकांसमोर जावेच. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पत्र मला मिळाले आहे व आपण ते पत्र जलसंसाधन खात्याकडे पाठवून दिले आहे. कारण सिद्धरामय्या हे तीन राज्यांमध्ये बैठक कधी घेऊया असे पत्रद्वारे विचारतात व ते म्हादईचे पाणी वळविण्याची भाषा पत्रत करतात.

कर्नाटकचे भाजप नेते येडीयुरप्पा याना पत्र लिहिण्यापूर्वी आपण निर्मला सावंत व राजेंद्र केरकर यांच्याशी बोललो होतो, असेही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचे वय झाल्याने त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे अशा प्रकारची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

वास्कोत जेटीचा विस्तार 

दरम्यान, मुरगाव बंदरात जर धक्क्याचा विस्तार करण्याचे काम होत असेल तर त्याला आमचा आक्षेप नाही. कारण धक्क्याचा वापर हा पोलाद किंवा अन्य कोणत्याही वस्तूच्या वाहतुकीसाठी करता येतो. कोळसा हाताळणीचा विस्तार करण्यास आमचा विरोध आहे. जेटीच्या विस्ताराला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

......... 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर