शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

म्हादई प्रश्नी सरकारने इच्छाशक्ती दाखवावी; बचाव अभियानाच्या निमंत्रकांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2024 12:55 IST

मदतीची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : म्हादई प्रश्नी गोवा सरकारने इच्छाशक्ती दाखवावी. या विषयाचे गांभीर्य त्यांनी ओळखावे असे आवाहन म्हादई बचाव अभियानच्या निमंत्रक निर्मला सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

गोव्याचे पथक कळसा-भांडूरा प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करू शकतात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २००९ मध्ये दिला होता. मात्र, या आदेशाकडे गोवा सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकारने हा आदेश 'म्हादई प्रवाह'च्या निदर्शनासदेखील आणून दिला नसल्याची टीका त्यांनी केली.

सावंत म्हणाल्या की, गोवा व कर्नाटक मध्ये म्हादई पाणी वाटपावरून वाद सुरू आहे. म्हादईसंदर्भातील याचिकांवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे काही आदेश दिले आहेत. मात्र, यापैकी काही आदेशांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. आता ते हे जाणीवपूर्वक करत आहे का? हे सरकारनेच सांगावे. म्हादईचा विषय सुटावा करण्यासाठी म्हादई प्रवाह प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यांना म्हादईबाबत सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या सुनावणी, आदेशांची कल्पना देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सरकारला त्यात अपयश आल्याचे दिसून येत असल्याची टीकात्यांनी केली.

म्हादई नदी वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात म्हादई बचाव अभियानसुद्धा लढा देत आहे. त्यामुळे सरकार आमचीही मदत घेऊ शकतात. यासाठी आम्ही नक्कीच सहकार्य करू. खरेतर म्हादईबाबत सरकारने आपली इच्छाशक्ती दाखवावी. म्हादईचा लढा आम्ही नक्कीच जिंकू, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी म्हादई बचाव अभियानचे वकील अॅड. गडणीस उपस्थित होते.

 

टॅग्स :goaगोवाriverनदी