शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

म्हादईप्रश्नी तोडग्याची पंतप्रधानांकडून ग्वाही, राज्यपालांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 19:59 IST

कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली. पंतप्रधानांनी तोडग्याचे आश्वासन राज्यपालांना दिले असा दावा राज्यपालांच्या वतीने सरकारने केला आहे.राज्यपाल मलिक यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. मलिक हे गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रथमच दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटले. म्हादई नदीचे गोव्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे व गोव्याची ती जीवनदायीनीच आहे असा मुद्दा राज्यपालांनी मांडल्याचे सरकारने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय वन मंत्रलयाने मंजुरी पत्र दिले हा मुद्दा राज्यपालांनी पंतप्रधानांसमोर मांडला. पंतप्रधानांनी विषय ऐकून घेतला व योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. राज्यपाल पंतप्रधानांना भेटल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फोनवरून राज्यपालांशी चर्चा केली व दोन दिवसांत सकारात्मक तोडगा निघेल, असे राज्यपालांना कळविले.राज्यपालांनी पंतप्रधानांशी अन्य कोणत्या विषयावर चर्चा केली ते सरकारने स्पष्ट केलेले नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यापूर्वी दोन वेळा जावडेकर यांच्याशी फोनवरून बोलले पण केंद्राकडून कोणतेच महत्त्वाचे असे नवे पत्र गोव्याला आले नाही. कर्नाटकला दिलेले मंजुरी पत्र रद्द करा किंवा स्थगित ठेवा अशी गोव्याची मागणी आहे. राज्यातील अनेक संस्था व विरोधी पक्ष एकवटले असून त्यांनी म्हादईप्रश्नी चळवळ चालवली आहे. विरोधी काँग्रेसने येत्या 15 रोजी दिल्लीत जाऊन निदर्शने करण्याचे ठरवले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची अलिकडेच भेट घेतली होती तेव्हा आपण हा विषय पंतप्रधानांर्पयत नेईन, असे राज्यपालांनी नमूद केले होते.