शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

म्हादईप्रश्नी तोडग्याची पंतप्रधानांकडून ग्वाही, राज्यपालांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 19:59 IST

कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली. पंतप्रधानांनी तोडग्याचे आश्वासन राज्यपालांना दिले असा दावा राज्यपालांच्या वतीने सरकारने केला आहे.राज्यपाल मलिक यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. मलिक हे गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रथमच दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटले. म्हादई नदीचे गोव्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे व गोव्याची ती जीवनदायीनीच आहे असा मुद्दा राज्यपालांनी मांडल्याचे सरकारने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय वन मंत्रलयाने मंजुरी पत्र दिले हा मुद्दा राज्यपालांनी पंतप्रधानांसमोर मांडला. पंतप्रधानांनी विषय ऐकून घेतला व योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. राज्यपाल पंतप्रधानांना भेटल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फोनवरून राज्यपालांशी चर्चा केली व दोन दिवसांत सकारात्मक तोडगा निघेल, असे राज्यपालांना कळविले.राज्यपालांनी पंतप्रधानांशी अन्य कोणत्या विषयावर चर्चा केली ते सरकारने स्पष्ट केलेले नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यापूर्वी दोन वेळा जावडेकर यांच्याशी फोनवरून बोलले पण केंद्राकडून कोणतेच महत्त्वाचे असे नवे पत्र गोव्याला आले नाही. कर्नाटकला दिलेले मंजुरी पत्र रद्द करा किंवा स्थगित ठेवा अशी गोव्याची मागणी आहे. राज्यातील अनेक संस्था व विरोधी पक्ष एकवटले असून त्यांनी म्हादईप्रश्नी चळवळ चालवली आहे. विरोधी काँग्रेसने येत्या 15 रोजी दिल्लीत जाऊन निदर्शने करण्याचे ठरवले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची अलिकडेच भेट घेतली होती तेव्हा आपण हा विषय पंतप्रधानांर्पयत नेईन, असे राज्यपालांनी नमूद केले होते.