शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

म्हादईप्रश्नी तोडग्याची पंतप्रधानांकडून ग्वाही, राज्यपालांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 19:59 IST

कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला दिलेल्या पत्रनंतर गोव्यात निर्माण झालेली स्थिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडली. पंतप्रधानांनी तोडग्याचे आश्वासन राज्यपालांना दिले असा दावा राज्यपालांच्या वतीने सरकारने केला आहे.राज्यपाल मलिक यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. मलिक हे गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रथमच दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना भेटले. म्हादई नदीचे गोव्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे व गोव्याची ती जीवनदायीनीच आहे असा मुद्दा राज्यपालांनी मांडल्याचे सरकारने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पासाठी केंद्रीय वन मंत्रलयाने मंजुरी पत्र दिले हा मुद्दा राज्यपालांनी पंतप्रधानांसमोर मांडला. पंतप्रधानांनी विषय ऐकून घेतला व योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. राज्यपाल पंतप्रधानांना भेटल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फोनवरून राज्यपालांशी चर्चा केली व दोन दिवसांत सकारात्मक तोडगा निघेल, असे राज्यपालांना कळविले.राज्यपालांनी पंतप्रधानांशी अन्य कोणत्या विषयावर चर्चा केली ते सरकारने स्पष्ट केलेले नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यापूर्वी दोन वेळा जावडेकर यांच्याशी फोनवरून बोलले पण केंद्राकडून कोणतेच महत्त्वाचे असे नवे पत्र गोव्याला आले नाही. कर्नाटकला दिलेले मंजुरी पत्र रद्द करा किंवा स्थगित ठेवा अशी गोव्याची मागणी आहे. राज्यातील अनेक संस्था व विरोधी पक्ष एकवटले असून त्यांनी म्हादईप्रश्नी चळवळ चालवली आहे. विरोधी काँग्रेसने येत्या 15 रोजी दिल्लीत जाऊन निदर्शने करण्याचे ठरवले आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची अलिकडेच भेट घेतली होती तेव्हा आपण हा विषय पंतप्रधानांर्पयत नेईन, असे राज्यपालांनी नमूद केले होते.