शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

म्हादईचे 5.5 टीएमसी पाणी कर्नाटकाला, लवादाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 7:56 PM

गोवा व कर्नाटकमधील म्हादई पाणीप्रश्नी अखेर दिल्लीतील म्हादई पाणी तंटा लवादाने आपला निवाडा मंगळवारी दिला. कर्नाटकला म्हादईचे 5.5 टीएमसी पाणी वापरण्यास म्हादई पाणी तंटा लवादाने मान्यता दिली आहे.

पणजी : गोवा व कर्नाटकमधील म्हादई पाणीप्रश्नी अखेर दिल्लीतील म्हादई पाणी तंटा लवादाने आपला निवाडा मंगळवारी दिला. कर्नाटकला म्हादईचे 5.5 टीएमसी पाणी वापरण्यास म्हादई पाणी तंटा लवादाने मान्यता दिली आहे. यापैकी 1.5 टीएमसी पाणी हे म्हादईच्या खो-यातच वापरावे लागेल. कर्नाटकला एकूण 35 टीएमसी पाणी हवे होते. तेवढे पाणी देण्याची मागणी मान्य झाली नाही हा गोव्याचा विजय आहे, असा दावा अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी व गोव्याचे अॅडव्हकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी केला आहे.

5.5 टीएमसी एवढे पाणी मिळाल्याने कर्नाटकमध्ये म्हादईच्या पाण्यासाठी लढणा-या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र कर्नाटकचे बांधकाम मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. लवादाच्या निवाडय़ाविषयी आपण नाराज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयात हस्तक्षेप करावा अशी विनंती आपण पंतप्रधानांना केली असल्याचे रेवण्णा यांनी म्हटले आहे. तसेच बेळगावच्या शेतकरी संघटनेनेही लवादाच्या निवाडय़ाला आक्षेप घेतला आहे. 

म्हादई नदीचा उगम कर्नाटकमध्ये होतो. मात्र या नदीचा जास्त प्रवाह गोव्यातच वाहतो. पणजीत म्हादई नदीलाच मांडवी नदी म्हटले जाते. गोवा व कर्नाटकमध्ये गेली अनेक वर्षे म्हादई नदीच्या पाण्यावरून वाद सुरू राहिला. दोन्ही राज्यांनी आतार्पयत लवादासमोर म्हादईचा लढा लढण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले. गोव्यातील म्हादई बचाव अभियानाने तर सर्वोच्च न्यायालयार्पयत जाऊन हा लढा लढविला. केंद्रात यूपीए सरकार अधिकारावर असताना केंद्र सरकारने या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी म्हादई पाणी तंटा लवादाची स्थापना केली होती. लवादाने दोन्हीबाजूंची मते जाणून घेतली. म्हादई नदी ही म्हादई व भिमगड ह्या अभयारण्यांमधून वाहते. कर्नाटकला पाणी दिले तर, गोव्यातील पाणी पुरवठा प्रकल्प, म्हादई अभयारण्यातील जैवविविधता, गोव्याचे पर्यावरण वगैरे अडचणीत येईल असा युक्तीवाद गोवा सरकार करत होते. लवादाने गोव्याच्या व कर्नाटकच्या सरकारी वकिलांचे तसेच साक्षीदारांचेही म्हणणो गेल्या काही महिन्यांत ऐकून घेतले. लवादाने म्हादईच्या खो-यास भेटही दिली होती. लवादाचा निवाडा येण्यापूर्वीच कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविण्यास आरंभ केला होता. काही दिवसांपूर्वीच हा प्रकार लक्षात आला व मग गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका सादर केली.

म्हादई पाणी तंटा लवादाची मुदत येत्या 2क् रोजी संपुष्टात येते. लवादाने मंगळवारी एकूण 2 हजार 711 पानांचा आपला निवाडा दिला. लवादाने मंगळवारी दिलेला निवाडा हा गोव्याला मान्य आहे, गोव्याचा विजय झाला आहे, असे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल नाडकर्णी यांनी सांगितले. कर्नाटकने एकूण 35 टीएमसी पाणी वळविण्यास मान्यता मागितली होती. यापैकी 20.13 टीएमसी पाणी आपल्याला म्हादईच्या खो:याबाहेर म्हणजे मलप्रभेमध्ये वगैरे वळवायचे आहे असे कर्नाटकचे म्हणणो होते. कर्नाटकला फक्त 5.5 पाणी वळविण्यास दिले असून त्यापैकी 1.5 टीएमसी पाणी हे म्हादईच्या खो-यातच वापरावे लागेल. 1.5 टीएमसी पाणी म्हादईच्या खो-यात कर्नाटकला वापरू देण्यास गोवा सरकारचा आक्षेप नव्हता असे नाडकर्णी यांनी सांगितले. कर्नाटकला प्रत्यक्षात फक्त 3.9 टीएमसी एवढेच पाणी वळवायला मिळेल, असे नाडकर्णी म्हणाले. 

दि. 17 एप्रिल 2014 रोजी लवादाने दिलेला अंतरिम आदेशही कायम आहे. जलविद्युत प्रकल्पांसाठी काळी नदीच्या सुपा जलाशयामध्ये एकूण 5.527 टीएमसी पाणी नेण्यास मान्यता मिळावी, अशी कर्नाटकची विनंती होती. लवादाने ती फेटाळून लावली आहे, असे नाडकर्णी यांचे म्हणणो आहे. नियोजित कोटणी जलाशयातून 7 टीएमसी पाणी वळविण्यास लवादाने मान्यता द्यावी अशीही कर्नाटकची विनंती होती. तीही लवादाने मान्य केलेली नाही. 

महाराष्ट्र राज्यातून म्हादईचा फारच छोटा प्रवाह वाहतो. महाराष्ट्राने म्हादईचे 7 टीएमसी पाणी मागितले होते. त्या राज्याला फक्त 1.33 टीएमसी पाणी म्हादईच्याच खो:यात वापरण्यास लवादाने मान्यता दिली आहे. म्हादईच्या खो:याबाहेर तिळारीसाठी पाणी नेण्याची महाराष्ट्राची विनंती लवादाने फेटाळली आहे. 

टॅग्स :goaगोवा