शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

माविन गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून हाकला, काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:27 IST

वीजमंत्रीपदी असताना केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्य़ाबाबत माविन गुदिन्हो यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी केली जावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयांव यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

पणजी - वीजमंत्रीपदी असताना केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्य़ाबाबत माविन गुदिन्हो यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. तक्रारदार आणि आरोपी हे दोघेही गोव्याच्या मंत्रिमंडळात आहेत. गुदिन्हो यांची मंत्रिमंडळातून त्वरित हकालपट्टी केली जावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर व सिद्धनाथ बुयांव यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

आता मुख्यमंत्रीपदी असलेल्या मनोहर र्पीकर यांनीच विरोधी पक्षनेतेपदी असताना गुदिन्हो यांच्याविरुद्ध तक्रार सादर केली होती. त्याच र्पीकर यांनी गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. र्पीकर यांनी गुदिन्हो यांना मंत्रीपद दिले आहे. माविन वीजमंत्री असताना पूर्ण गोव्यात र्पीकर यांनी मोठा गोंधळ माजवला व न्यायालयाने उद्योगांचा वीज पुरवठा बंद ठेवला होता. अनेक उद्योगांची त्यावेळी मोठी हानी झाली. र्पीकर त्या हानीला कारण ठरतात. आता त्यांनी गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात ठेवू नये, असे बुयांव म्हणाले. गोव्यात वीजबंदी लागू झाली होती तेव्हा कसेबसे जनरेटरच्या आधारे दोन वर्षे काही उद्योग चालत होते. अनेक छोटे उद्योग प्रचंड अडचणीत आले होते. र्पीकर यांचे काही नुकसान झाले नाही. ते आता गुदिन्हो यांना मंत्रिमंडळात घेऊन बसले आहेत. जर र्पीकर यांना त्यांची तक्रार खरीच होती व आहे असे वाटत असेल तर त्यांनी गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून वगळावे. अनेक भ्रष्ट राजकारण्यांचे मुख्यमंत्री गॉडफादर बनले आहेत,अशी टीका बुयांव यांनी केली.

आरोप निश्चित करण्याबाबतच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला गुदिन्हो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही व युक्तीवाद करण्यास सांगितल्याने गुदिन्हो यांना सर्वोच्च न्यायालयातील त्यांची विशेष आव्हान याचिका मागे घ्यावी लागली आहे.

दरम्यान, पणजीतील पाणीप्रश्नी बोलताना गिरीश चोडणकर म्हणाले, की पणजीत कुठच्या भागात लोकांना पाण्याची समस्या कशी भोगावी लागते ते आपल्याला ठाऊक आहे. कारण आपण गेल्या निवडणुकीवेळी पणजीतील प्रत्येक घरी भेट दिली. पणजीतील प्रत्येक तिस:या मतदाराने आपल्याला मत दिले आहे. मुख्यमंत्री र्पीकर हे निवडणुकीवेळी पणजीवासियांच्या घरी गेले नाही. त्यामुळे त्यांना पाणी समस्या कळली नाही. त्यांनी आपल्यासोबत यावे. आपण त्यांना पाणी समस्या असलेल्या पणजीवासियांच्या घरी घेऊन जातो. त्यांनी लोकांचे म्हणणो ऐकावे, असे चोडणकर म्हणाले.पणजीत पाण्याचा प्रश्नच नाही, असे भाजपचे पदाधिकारी म्हणतात. त्यांचे धाडस पाहून आपल्याला दु:ख वाटत नाही व हसताही येत नाही. त्यांना देवाने माफ करावे एवढेच आपण म्हणू शकतो, असे चोडणकर म्हणाले. आपली मुख्यमंत्र्यांशी कधीही याप्रश्नी जाहीर चर्चेची तयारी आहे, त्यांनी वेळ व जागा ठरवावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या