शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

तिलारी धरणातून पाणी सोडल्याने गोव्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:01 IST

शेकडो लोकांना हलवले : रात्री आठच्या सुमारास घरांत शिरले पाणी, वीज खंडित, लोक भयभीत

पणजी - महाराष्ट्र व गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून  पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरु असल्याने गोव्यातील डिचोली तालुक्यांतील गावांना पुराचा तडाखा बसलेला आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. वीज ट्रान्सफार्मरच पाण्याखाली गेल्याने विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. लोकांचे हाल सुरु झालेले आहेत.

डिचोली तालुक्यातील साळ ( लोकसंख्या 2000) मेणकुरे (1800), नानोडा (1000) आमोणे (4500)  आदी गावांना पुराचा तडाखा बसला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर आदींनी या गांवाना भेट देऊन पूगस्त लोकांना दिलासा दिला. घाबरून न जाण्याचे आवाहन केले.

धरणातूनपूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यामुळे सालसह अनेक  गावांना पुराने वेढलेले आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरांमध्ये पाणी शिरू लागल्याने लोक घाबरले आणि सुरक्षितस्थळी आसरा शोधू लागले. रात्रीची वेळ, कोसळणारा पाऊस, खंडित वीज आणि घरांत शिरणारे पाणी यामुळे लोक संतप्त आणि भयभीत झालेले होते. भूमिका मंदिर परिसरातील सखल भागात सुमारे 100 हून अधिक जणांना रात्री उशिरा बोट व इतर माध्यमांचा वापर जारून पंचयात सभागृहात हलविण्यात आले आहे .

पातळी 43.30 मीटर तिलारी धरणाची धोक्याची पातळी 43.60 मीटर आहे. सध्या ही पातळी 43.30 मीटर झाल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला असून डाव्या कालव्याद्वारे धरणाचे पाणी तिलारी नदीत सोडण्यात येत आहे. बुधवारी धरणाचा चौथा दरवाजा उघडून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला व नदीपात्रातील संरक्षक भिंत ओलांडून पाणी घोटगेवाडी गावातील सखल भागात घुसले.

टॅग्स :floodपूरgoaगोवाDamधरण