शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

तिलारी धरणातून पाणी सोडल्याने गोव्यातील अनेक गावांना पुराचा तडाखा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:01 IST

शेकडो लोकांना हलवले : रात्री आठच्या सुमारास घरांत शिरले पाणी, वीज खंडित, लोक भयभीत

पणजी - महाराष्ट्र व गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून  पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरु असल्याने गोव्यातील डिचोली तालुक्यांतील गावांना पुराचा तडाखा बसलेला आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. वीज ट्रान्सफार्मरच पाण्याखाली गेल्याने विजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. लोकांचे हाल सुरु झालेले आहेत.

डिचोली तालुक्यातील साळ ( लोकसंख्या 2000) मेणकुरे (1800), नानोडा (1000) आमोणे (4500)  आदी गावांना पुराचा तडाखा बसला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर आदींनी या गांवाना भेट देऊन पूगस्त लोकांना दिलासा दिला. घाबरून न जाण्याचे आवाहन केले.

धरणातूनपूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यामुळे सालसह अनेक  गावांना पुराने वेढलेले आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास घरांमध्ये पाणी शिरू लागल्याने लोक घाबरले आणि सुरक्षितस्थळी आसरा शोधू लागले. रात्रीची वेळ, कोसळणारा पाऊस, खंडित वीज आणि घरांत शिरणारे पाणी यामुळे लोक संतप्त आणि भयभीत झालेले होते. भूमिका मंदिर परिसरातील सखल भागात सुमारे 100 हून अधिक जणांना रात्री उशिरा बोट व इतर माध्यमांचा वापर जारून पंचयात सभागृहात हलविण्यात आले आहे .

पातळी 43.30 मीटर तिलारी धरणाची धोक्याची पातळी 43.60 मीटर आहे. सध्या ही पातळी 43.30 मीटर झाल्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला असून डाव्या कालव्याद्वारे धरणाचे पाणी तिलारी नदीत सोडण्यात येत आहे. बुधवारी धरणाचा चौथा दरवाजा उघडून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला व नदीपात्रातील संरक्षक भिंत ओलांडून पाणी घोटगेवाडी गावातील सखल भागात घुसले.

टॅग्स :floodपूरgoaगोवाDamधरण