शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गोव्याच्या अनेक भागांत गेल्या ५२ तासांपासून वीज नाही, नळही कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 15:02 IST

पणजीपासून अगदी जवळ असलेल्या मेरशी, सांताक्रुझ, व्हडलेभाट ताळगाव व अन्य ठिकाणी वीज पुरवठा शनिवारपासून बंद आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांतील ग्रामीण भागातही तीन दिवस वीज नाही.

पणजी : गोव्याच्या विविध भागांमध्ये गेले किमान ५२ तास वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. वादळ येऊन गेले तरी, अनेक ठिकाणी वीज ट्रान्सफोर्मर मोडल्याने तसेच वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. वीज नाही म्हणून नळाला पाणीही नाही, अशी अत्यंत दयनीय स्थिती शेकडो गोमंतकीय कुटूंबांच्या वाट्याला गेल्या तीन दिवसांपासून आली आहे.

पणजीपासून अगदी जवळ असलेल्या मेरशी, सांताक्रुझ, व्हडलेभाट ताळगाव व अन्य ठिकाणी वीज पुरवठा शनिवारपासून बंद आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांतील ग्रामीण भागातही तीन दिवस वीज नाही. आता पाणी पुरवठाही नाही. आमची मुले झोपत नाहीत, घरातील आजारी व वद्ध वडील किंवा आजोबांनाही खूप त्रास होत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी लोक करत आहेत. 

वीज नाही, पंखे बंद व पाणीही नाही अशावेळी कोविड संकट काळात लोकांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. वीज कर्मचाऱ्यांनी काही भागांमध्ये जलदगतीने काम केले व वीज पुरवठा सुरळीत केला. पर्वरीमध्ये ४८ तासांनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला पण अनेक गावे व वाडे अजून अंधारात आहेत. वीज खात्याला मनुष्यबळ कमी पडत आहे. काही वीज कर्मचाऱ्यांना कोविड झाला आहे. त्यामुळे ते कामावर येऊ शकत नाहीत. काही भागांत तारांसकट पूर्ण वीज खांबच मोडून पडले आहेत.

तिसवाडीसह प्रत्येक तालुक्यातील लोक आपआपल्या आमदारांना व मंत्र्यांना फोन करून थकले आहेत. वीज खात्याचे अभियंते धावपळ करत आहेत पण लोकही हताश झाले आहेत. त्यांची सहनशीलता संपू लागली आहे. काही लोकांनी शहरी भागातील तसेच उपनगरातील आपले फ्लॅट सोडून अन्य भागांमध्ये (जिथे वीज आहे) तिथे सोमवारी स्थलांतर केले. 

टॅग्स :goaगोवाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळelectricityवीज