शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

गोव्याच्या अनेक भागांत गेल्या ५२ तासांपासून वीज नाही, नळही कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 15:02 IST

पणजीपासून अगदी जवळ असलेल्या मेरशी, सांताक्रुझ, व्हडलेभाट ताळगाव व अन्य ठिकाणी वीज पुरवठा शनिवारपासून बंद आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांतील ग्रामीण भागातही तीन दिवस वीज नाही.

पणजी : गोव्याच्या विविध भागांमध्ये गेले किमान ५२ तास वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. वादळ येऊन गेले तरी, अनेक ठिकाणी वीज ट्रान्सफोर्मर मोडल्याने तसेच वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. वीज नाही म्हणून नळाला पाणीही नाही, अशी अत्यंत दयनीय स्थिती शेकडो गोमंतकीय कुटूंबांच्या वाट्याला गेल्या तीन दिवसांपासून आली आहे.

पणजीपासून अगदी जवळ असलेल्या मेरशी, सांताक्रुझ, व्हडलेभाट ताळगाव व अन्य ठिकाणी वीज पुरवठा शनिवारपासून बंद आहे. बार्देश, डिचोली, सत्तरी, पेडणे अशा तालुक्यांतील ग्रामीण भागातही तीन दिवस वीज नाही. आता पाणी पुरवठाही नाही. आमची मुले झोपत नाहीत, घरातील आजारी व वद्ध वडील किंवा आजोबांनाही खूप त्रास होत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी लोक करत आहेत. 

वीज नाही, पंखे बंद व पाणीही नाही अशावेळी कोविड संकट काळात लोकांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. वीज कर्मचाऱ्यांनी काही भागांमध्ये जलदगतीने काम केले व वीज पुरवठा सुरळीत केला. पर्वरीमध्ये ४८ तासांनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला पण अनेक गावे व वाडे अजून अंधारात आहेत. वीज खात्याला मनुष्यबळ कमी पडत आहे. काही वीज कर्मचाऱ्यांना कोविड झाला आहे. त्यामुळे ते कामावर येऊ शकत नाहीत. काही भागांत तारांसकट पूर्ण वीज खांबच मोडून पडले आहेत.

तिसवाडीसह प्रत्येक तालुक्यातील लोक आपआपल्या आमदारांना व मंत्र्यांना फोन करून थकले आहेत. वीज खात्याचे अभियंते धावपळ करत आहेत पण लोकही हताश झाले आहेत. त्यांची सहनशीलता संपू लागली आहे. काही लोकांनी शहरी भागातील तसेच उपनगरातील आपले फ्लॅट सोडून अन्य भागांमध्ये (जिथे वीज आहे) तिथे सोमवारी स्थलांतर केले. 

टॅग्स :goaगोवाTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळelectricityवीज