शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

देशातील अनेक खाणी २०२० पर्यंत होणार बंद; गोव्यातील खाणींबाबत लवकरच तोडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:42 IST

मोदी सरकारने शंभर दिवसांची कारकिर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने सरकारचे विविध निर्णय सांगण्यासाठी जोशी यांनी पणजीत पत्रकार परिषद घेतली.

पणजी : देशातील अनेक मोठ्या खनिज खाणी येत्या २०२० सालापर्यंत बंद होणार आहेत व त्यामुळे जी समस्या निर्माण होईल, त्याचा विचार आतापासूनच केंद्रीय स्तरावरील मंत्र्यांचा गट करत आहे, असे केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी येथे सांगितले, तसेच गोव्यातील खनिज खाणींविषयी लवकरत तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारने शंभर दिवसांची कारकिर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने सरकारचे विविध निर्णय सांगण्यासाठी जोशी यांनी पणजीत पत्रकार परिषद घेतली. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हेही यावेळी उपस्थित होते. जोशी म्हणाले की, गोव्यातील खनिज खाणींचा विषय किती गंभीर आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पटवून दिले आहे. पंतप्रधानही तोडगा काढण्याविषयी सकारात्मक आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही आपल्याला भेटले. केंद्रीतील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा गट खनिज खाणप्रश्नी विचार करत आहे. त्यासाठी बैठकाही होत आहेत. अमित शहादेखील त्या समितीमध्ये आहेत. लवकरच या समितीची एक बैठक होईल.

सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या गोव्यातील खाणप्रश्नावर नेमका कधी तोडगा निघेल, या वर्षी की पुढील वर्षी असे पत्रकारांनी विचारले असता, प्रल्हाद जोशी यांनी नेमके उत्तर देणे टाळले, परंतु यावर लवकरच तोडगा निघेल, एवढेच ते म्हणाले. ओरिसा, कर्नाटक अशा राज्यांतील अनेक मोठ्या खाणी बंद होणार आहेत. त्यामुळेही काही प्रश्न उद््भवणार आहेत. या सगळ्याचा विचार केंद्रातील ज्येष्ठ मंत्र्यांचा गट तथा समिती करत आहे. गोव्याविषयी न्यायालयीन आदेश आल्यानंतर खाण प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनला. त्यावर योग्य असा तोडगा काढायलाच हवा, हे केंद्र सरकारला कळाले आहे. त्याच दिशेने वाटचाल चालू आहे. कायदा दुरुस्त करायचा की काय, ते शेवटी मंत्र्यांची समिती ठरवेल.साधनसुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूककेंद्र सरकार रेल्वे वाहतूक क्षेत्रात पुढील पाच वर्षांत ५० लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे, तसेच साधनसुविधा निर्माण क्षेत्रात पुढील दहा वर्षांत १०० लाख कोटींची गुंतवणूक केली जाईल. देशातील अन्य राज्यांसह गोव्यालाही याचा लाभ निश्चितच होईल. गोव्यातील महामार्ग दुरुस्तीच्या कामांसाठी अलीकडेच दोनशे कोटी रुपये केंद्राने दिले आहेत, असे प्रल्हाद जोशी यांनी नमूद केले.