शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

पर्रीकरांच्या समाधीस्थळी झगमगाट, तर भाऊसाहेबांकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:53 IST

भाऊसाहेबांच्या मिरामार येथील जुन्या झालेल्या समाधीला पूर्ण न्याय सरकारने द्यावा व आश्वासन पाळावे.

सुभाष वेलिंगकर 

मुक्त गोमंतकाचे भाग्यविधाते, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची ५०वी पुण्यतिथी दि. १२ ऑगस्ट रोजी आहे, त्या निमित्ताने शासकीय पातळीवर ही पुण्यतिथी गोवा सरकारने साजरी करावी, अशी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांनी केलेल्या रास्त मागणीला आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. तसेच भाऊसाहेबांच्या मिरामार येथील जुन्या झालेल्या समाधीला पूर्ण न्याय सरकारने द्यावा व आश्वासन पाळावे.

भाऊसाहेबांच्या समाधीचे यथायोग्य नूतनीकरण, विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठीच्या योजनेचे ठोस वेळापत्रक व योजनेचा तपशील येत्या पुण्यतिथीनिमित्ताने सरकारने जाहीर करावा व कार्यवाहीचा प्रारंभ करावा.

पर्रीकर यांच्या कार्यकाळात कांपाल येथे असलेले दयानंद बांदोडकर फुटबॉल मैदान काढून टाकून तिथे पार्किंग व्यवस्था केली होती. कांपालच्या परिसरात मोकळ्या जागी आता सरकारने भाऊसाहेबांच्या मैदानस्मारकाचे पुनरुत्थान करावे, अशी मागणी त्यांनी केली. गोमंतकीयांचा भाऊसाहेबांच्या प्रती असलेल्या आदराच्या भावनेतून केलेल्या उपरोक्त माफक मागण्यांची पूर्तता भाजप सरकारने भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने करावी.

मुख्यमंत्री सावंत यांनी आश्वासन पाळावे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हल्लीच स्व. भाऊसाहेबांच्या समाधीचे यथायोग्य नूतनीकरण व सुशोभीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. त्या घोषणेला मूर्त स्वरूप देण्याची स्व. भाऊसाहेबांच्या ५० व्या पुण्यतिथीची संधी मुख्यमंत्र्यांनी साधावी आणि योजनेचा शुभारंभ त्या दिवशी करावा

दोन दिवसच खुले, अन्यथा कडीकुलपात.....

दि. १२ मार्च व १२ ऑगस्ट या दोन तिथींच्या पूर्वी स्मारकाची कामचलावू साफसफाई सरकारचे संबंधित खाते करते. हेच दोन दिवस समाधीस्थळ लोकांसाठी खुले असते. अन्यथा बाराही महिने समाधीला कडीकुलपात बंदिस्त ठेवले जाते. गेली कित्येक वर्षे या समाधीस्थानी छतातून होणारी पावसाची २ गळती सरकार थांबवू शकलेले नाही. ही समाधी कोणत्या थोरपुरुषाची आहे, तो कसा दिसत होता, हे दर्शविणारी प्रतिमा व त्यांचे कार्य दर्शक फलक लावला नाही. सायंकाळ, रात्रीच्या वेळी समाधीस्थळ नीट प्रकाशमान दिसावे, यासाठी समाधीस्थळ परिसरात कोणतीही व्यवस्था नाही. शेजारच्या रस्त्यालगतच्या खांबावरील दिव्याच्या प्रकाशात समाधीचे दर्शन होते.

दिरंगाई का होतेय?

शेजारीच लागून असलेल्या स्व. मनोहर पर्रीकर यांच्या लखलखित, भव्य, विस्तारित, आधुनिक स्थापत्य कौशल्ययुक्त समाधीच्या झगमगाटाच्या पार्श्वभूमीवर, स्व. भाऊसाहेबांच्या समाधीला एक दुर्लक्षित दुय्यम, उपेक्षित असे स्वरूप आलेले आहे. ही स्थिती अपमानास्पद आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी करूनही सरकारने तिथे लक्ष दिलेले नाही. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर