शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 12:19 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे.मनोहर पर्रीकर व माझी मागच्या ४० वर्षापासून मैत्री असून स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चालन, डाऊन टू अर्थ असे व्यक्तीमत्व आम्ही सर्वांनीच गमावलेले असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या विकासाचे एक ‘आदर्श स्तंभ’ असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

पंकज शेट्ये

वास्को - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. मनोहर पर्रीकर व माझी मागच्या ४० वर्षापासून मैत्री असून स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चालन, डाऊन टू अर्थ असे व्यक्तीमत्व आम्ही सर्वांनीच गमावलेले असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (17 मार्च) निधन झाल्याचे वृत्त मिळताच उशिरा रात्री नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले. याप्रसंगी गोव्यात दाखल झाल्यानंतर बोलताना मनोहर पर्रीकर केवळ भाजपचे नेते नव्हते तर ते माझे जीवलग मित्र असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगून मागच्या ४० वर्षापासून आमची दोघांची मैत्री असल्याचे सांगितले. जेव्हा मी महाराष्ट्रातून भाजपचे काम करायचो तेव्हापासून आपण गोव्यात येत असून आमची दोघांची घनिष्ठ मैत्री होती असे गडकरी यांनी सांगितले. संघटनेच्या व आपल्या तत्वावर चालण्यासाठी वचनबद्द, एकदम विनम्र, स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चाल - चलन यांचे मनोहर पर्रीकर एक चांगले उदाहरण असल्याचे गडकरी यांनी याप्रसंगी सांगून त्यांनी सतत गोव्याच्या विकासासाठी व हितासाठी काम केलेले असल्याचे म्हणाले.

मनोहर पर्रीकर यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याचा आणखी विकास कसा करायचा, गोमंतकीय नागरीकांच्या हितासाठी कसे काम करायचे याकरीताच झिजलेले असून त्यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. पर्रीकरांच्या निधनामुळे गोव्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे सुद्धा मोठे नुकसान झाले असल्याचे गडकरी म्हणाले. जेव्हा भाजप गोव्यात शून्यातून वर येत होता तेव्हापासून मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपच्या विकासासाठी काम केलेले असून गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यात व लोकसभेत भाजपचे दोन्ही खासदार निवडून आणण्यामागे पर्रीकरांचा सिंहाचा वाटा असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी सतत गोव्याच्या विकासासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलेले असून असा नेता भविष्यात मिळणे एकदम कठीण असून त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी नेत्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्याच नव्हे तर देशाच्या हितासाठी सुद्धा अनेक उत्तम कामे केली असून देश त्यांना कधीच विसरू शकणार नसल्याचे ते शेवटी बोलताना म्हणाले.गोव्यातील ‘अटल सेतू’ या मांडवीवरील तिसऱ्या पूलाच्या उद्घाटन समारंभावेळी माझी व पर्रीकरांची शेवटची भेट

मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला ‘अटल सेतू’ पूलाच्या उद्घाटनाला बोलविल्यानंतर आपण या समारंभाला आल्यानंतर प्रथम त्यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली. मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या विकासाचे एक ‘आदर्श स्तंभ’ असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त करून ‘अटल सेतू’ पूलाच्या उद्घाटनाच्या वेळी आमची दोघांची शेवटची भेट असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाgoaगोवा