शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

मनोहर पर्रिकरांनी 2020 पर्यंत गोवा प्लास्टिक मुक्त करण्याचं लोकांना केलं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 15:04 IST

गोवा राज्य 2020 पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्यास राज्य सरकारला लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी केले. 

ठळक मुद्देगोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प करा.सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करण्याची गरजपाच हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा

पणजी, दि. 15 - गोवा राज्य 2020 पर्यंत प्लास्टिक मुक्त करण्यास राज्य सरकारला लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी केले. स्वातंत्र्यदिनाच्या पाश्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 2020 पर्यंत गोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प करा. यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. गोव्यात राज्य सरकारने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी घातली आहे.  मात्र, आपण सर्वांनी आत्तापासून प्लॉस्टिकच्या पिशव्यांचा वापर करणे टाळावे. तसेच, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरु नका. तरच, गोवा राज्य प्लास्टिक मुक्त होऊ शकतो. याचबरोबर, मनोहर पर्रिकर यांनी प्लॉस्टिकच्या पिशव्यातून कचरा रस्त्यांवर किंवा समुद्र किना-यावर फेकणा-यांना सुद्धा त्यांची सवय बदलण्याचे आवाहन यावेळी केले. देशात आणि राज्यात प्राथमिक शिक्षण गुणवत्ता सुधारली पाहिजे. यासाठी सुद्धा सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, असेही मनोहर पर्रिकर म्हणाले.दरम्यान, गोव्यात गेल्या जुलैपासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री व खरेदीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. या पिशव्यांची जर कोणी खरेदी किंवा विक्री करताना कुणी आढळून आला तर पाच हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा आहे.

राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी....राष्ट्रीय हरित प्राधिकरण (एनजीटी) या संघटनेने राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाड असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ति स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली अशी घोषणा करण्यात आली आहे की, जर कोणत्या व्यक्तीने अशा प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्यास पर्यावरणीय नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये दंड भरावा लागेल.