शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

प्रशासन सक्रिय करण्यास प्राधान्य, म्हादई व खाण प्रश्न हाताळूच : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 20:41 IST

खाणींचा प्रश्न लवकरच केंद्राकडे नेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

पणजी : निवडणूक आचारसंहिता आता उठलेली असल्याने राज्य प्रशासन सक्रिय करण्यासाठी आपण प्राधान्य देईन. तसेच म्हादई पाणी प्रश्न व राज्याचा खनिज खाणप्रश्न आपण प्राधान्याने हाताळीन, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.चौघा नव्या आमदारांच्या शपथविधी सोहळ्य़ानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की निवडणूक आचारसंहितेच्या काळात काही प्रकल्प अडकले. काही कामे प्रलंबित राहिली. ती मार्गी लावली जातील. प्रशासनाची घडी मला नीट करायची आहे. शिवाय म्हादई पाणीप्रश्न व खनिज प्रश्नही सोडवायचा आहे. खनिज खाणी लवकर सुरू करण्यासाठी प्राधान्य आहे. आपण अजून हा विषय नव्याने केंद्र सरकारकडे मांडला नाही, कारण केंद्रातील नवे सरकार स्थिरस्थावर होऊ द्या. खाण मंत्रालय सांभाळणारे नवे मंत्री कोण तेही स्पष्ट होऊ द्या. मग मी केंद्राकडे गोव्याचा प्रस्ताव घेऊन जाईन.मंत्र्यांना अतिरिक्त खाती लवकर देणार काय असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की अगोदर आपण सर्व मंत्र्यांशी चर्चा करीन. त्यांची काय अपेक्षा आहे हे जाणून घेईन. त्यांना कोणते खाते हाताळणो जास्त आवडेल हे मी विचारून घेईन. तसेच आमदारांशी महामंडळांच्या विषयाबाबत बोलेन व मग पाऊले उचलीन. सध्या मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा मात्र निर्णय झालेला नाही. येत्या 4 रोजी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेण्याचा विचार आहे.4 जून रोजी अधिवेशनसभापतींची निवड करण्यासाठी 4 जून रोजी विधानसभा अधिवेशन बोलविण्याचा विचार आहे. तारीख अजून निश्चित झालेली नाही. मंत्री विजय सरदेसाई व अपक्षांशी बोलून मी तारीख निश्चित करीन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हंगामी सभापती मायकल लोबो यांनी मात्र येत्या 4 रोजी विधानसभा अधिवेशन होईल, असे पत्रकारांना सांगितले. अनेक दिवसांचे मोठे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या दुस:या किंवा तिस:या आठवडय़ात बोलविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.दरम्यान, आपल्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार तीन वर्षाचा उर्वरित काळ पूर्ण करील. आमचे सरकार भक्कम आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळातून कुणाला वगळण्याचा वगैरे निर्णय नाही. सत्ताधारी आघाडीतील सहकारी पक्ष व अपक्षांना सोबत घेऊन आपण पुढे जाईन. मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारला पूर्वी दिलेले पाठींब्याचे पत्र मागे घेतले की नाही ते मला ठाऊक नाही. त्यांनी जर पाठींबा मागे घेतला नाही तरी, आमची हरकत नसेल. उद्या चर्चिल आलेमाव यांनी जरी आमच्या सरकारला पाठींबा दिला तरी, आम्ही त्या पाठींब्याचे स्वागत करू. आलेमाव पाठींबा देतो असे अनेकदा सांगतात पण त्याविषयीचे पत्र मात्र देत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा