शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आधारभूत किमत २०० रुपये करा, काजू उत्पादकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:02 IST

या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात.

- नारायण गावस 

पणजी : यंदाच्या वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून अनेक शेतकऱ्यांना  याचा फटका बसला आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी आता राज्यभरातून शेतकऱ्यांकडून केली जात आहे. किमान दोनशे रुपये आधारभूत करावी अशी मागणी होत आहे. यंदा उत्पादन ५० टक्क्यांनी  कमी झाल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी आधारभूतसाठी अर्ज केले हाेते यातील काही शेतकऱ्यांना अजूनही आधारभूत  किमत मिळालेली नाही.

या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात. पण यंदाच्या वर्षीही सरकारने काजू उत्पादकांना आधारभूत देण्याचा निर्णय घेतला आहे.  गेल्या वर्षी १२५ रुपये दर होता यंदा काजू दर हा १११ ते ११३ रुपये पर्यंत आहे. त्यामुळे या वर्षी आधारभूत किमान २०० रुपये द्यावी अशी मागणी होत आहे. यंदा लागवडही कमी आणि दरात खूप कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा त्रास झाला. त्यामुळे  सरकारने आधारभूत किमती वाढ करावी. सत्तरी काणकोण केपे अशा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हा पूर्णपणे काजू उत्पादनावर अवलंबून असतात.  त्यामुळे या शेतकऱ्यांना या वर्षी मोठी आर्थिक अडचण समारा जावे लागणार आहे. 

या वर्षी काजूच्या मशागतीसाठी केलेला खर्चही उभा झालेला नाही. काजू रोपट्यांना खत घालणे तसेच गवत कापणी त्यांना पाणी देणे यासाठी कामगारांची मोठी आवश्यकता असते. या कामगारांचा रोजंदारीवर खूप खर्च येत असतो. त्यांना केलेला खर्चही  या काजू उत्पादनातून उभा होत नाही. त्यामुळे सरकारने यंदा किमान २०० रुपये आधारभूत किमत करावी असे सत्तरीतील शेतकरी रामा गावकर यांनी सांगितले. काणकोणचे शेतकरी कृष्णा वेळी म्हणाले, आता काजू व्यावसाय परवडत नाही तसेच पूर्वी सारखा दरही नाही आणि उत्पादनही मिळत नाही. त्यामुळे हा व्यावसाय करणे कठीण झाले आहे. जर सरकारला आता हा व्यावसाय शेतकऱ्यांकडून करुन घ्यायचा असेल तर त्यांना अर्थिक सहाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान २०० रुपये आधारभूत किमत द्यावी असे ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवा