शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आजारी पर्रीकरांनी 7 दिवसात पर्यायी व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषण, राजन घाटेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 13:39 IST

गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे.

पणजी :  गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत गोवा सिटीझन फोरमतर्फे बोलताना घाटे म्हणाले की,  'गेले आठ महिने पर्रीकरांच्याआजारपणामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. त्यांनी आपल्याकडील 32 खाती अन्य मंत्र्याकडे देण्याची गरज आहे. तसेच अधिकारही बहाल करण्याची गरज आहे. गंभीर आजारातून त्यांना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो. परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीने प्रशासन कोलमडले आहे ते पाहता आंदोलनाशिवाय पर्याय नाही' 

घाटे पुढे म्हणाले की, 'सरकार दरबारी लोकांची कोणतीही कामे होत नाहीत. खाणबंदीचा प्रश्‍न सुटलेला नाही. हे सरकार बेरोजगारांना नोकरी देऊ शकलेले नाही. प्रशासन अक्षरश: कोलमडले असून कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यामुळे पर्रीकर यांनी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. गेल्या आठ महिन्यात पर्रीकर अमेरिकेला तसेच दिल्लीला उपचार घेऊन आले. तेथून राज्यकारभार चालवला.आता ताळगावच्या खासगी निवासस्थानाहून ते कारभार हाकत आहेत.

परंतु प्रशासनात कोणतेही काम होत नाही. लोकांमध्ये यामुळे नाराजीची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून कारभार हाकायचा असतो, स्वतःच्या खासगी निवासस्थानामधून नव्हे. पर्रीकर यांना आजारपणामुळे विश्रांतीची गरज आहे. त्यांनी आपल्याकडील कारभार इतर एखाद्या मंत्र्याकडे सोपविण्याची गरज आहे. तसेच खातेवाटपही करण्याची गरज आहे.'

घाटे म्हणाले की ' या आधीही आपल्याला उपोषणासारखे आंदोलन करावे लागले आहे. 16 जुलै 2013 रोजी माहिती आयोग स्थापन करण्यासाठी मी बेमुदत उपोषण पुकारले ते सात दिवस चालले. 7 दिवसांनी तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आयोग स्थापन करण्याचे आश्वासन देऊन मला उपोषण मागे घेण्यास सांगितले. गंभीर आजारी असलेले पर्रीकर मुख्यमंत्रिपदाला न्याय देऊ शकत नाहीत. आम्हाला राजेशाही नको, लोकशाही पद्धतीने सरकार चालवा.' 

आपल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला बिगर शासकीय संघटना,  समविचारी राजकीय पक्ष कामगार, शेतकरी यांनीही पाठिंबा द्यावा असे आवाहन घाटे यांनी केले आहे. दरम्यान, 'नारी अधिकार' या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दिया शेटकर यांनी राज्यात बेकारी प्रचंड वाढल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, 'एकही नवी नोकरी गेल्या वर्षभरात निर्माण झालेली नाही. त्याआधी भाजपा नेत्यांनी नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लाच घेऊन आपला प्रताप दाखवला आहे असा आरोपही  त्यांनी केला त्या म्हणाल्या की वीजमंत्री निलेश काब्राल यांनी  पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळात 10 ते 15 वर्षांसाठी कंत्राटी भरती केली आहे. या जागी कायमस्वरूपी भरती करता आली असती. सरकारचे याकडेच लक्ष नाही. गोवा आज कसिनोंच्या रूपाने जुगारी अड्डा बनला आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताBJPभाजपा