शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

आजारी पर्रीकरांनी 7 दिवसात पर्यायी व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषण, राजन घाटेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 13:39 IST

गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे.

पणजी :  गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेत गोवा सिटीझन फोरमतर्फे बोलताना घाटे म्हणाले की,  'गेले आठ महिने पर्रीकरांच्याआजारपणामुळे प्रशासन ठप्प झाले आहे. त्यांनी आपल्याकडील 32 खाती अन्य मंत्र्याकडे देण्याची गरज आहे. तसेच अधिकारही बहाल करण्याची गरज आहे. गंभीर आजारातून त्यांना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो. परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीने प्रशासन कोलमडले आहे ते पाहता आंदोलनाशिवाय पर्याय नाही' 

घाटे पुढे म्हणाले की, 'सरकार दरबारी लोकांची कोणतीही कामे होत नाहीत. खाणबंदीचा प्रश्‍न सुटलेला नाही. हे सरकार बेरोजगारांना नोकरी देऊ शकलेले नाही. प्रशासन अक्षरश: कोलमडले असून कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यामुळे पर्रीकर यांनी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. गेल्या आठ महिन्यात पर्रीकर अमेरिकेला तसेच दिल्लीला उपचार घेऊन आले. तेथून राज्यकारभार चालवला.आता ताळगावच्या खासगी निवासस्थानाहून ते कारभार हाकत आहेत.

परंतु प्रशासनात कोणतेही काम होत नाही. लोकांमध्ये यामुळे नाराजीची भावना आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून कारभार हाकायचा असतो, स्वतःच्या खासगी निवासस्थानामधून नव्हे. पर्रीकर यांना आजारपणामुळे विश्रांतीची गरज आहे. त्यांनी आपल्याकडील कारभार इतर एखाद्या मंत्र्याकडे सोपविण्याची गरज आहे. तसेच खातेवाटपही करण्याची गरज आहे.'

घाटे म्हणाले की ' या आधीही आपल्याला उपोषणासारखे आंदोलन करावे लागले आहे. 16 जुलै 2013 रोजी माहिती आयोग स्थापन करण्यासाठी मी बेमुदत उपोषण पुकारले ते सात दिवस चालले. 7 दिवसांनी तत्कालीन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आयोग स्थापन करण्याचे आश्वासन देऊन मला उपोषण मागे घेण्यास सांगितले. गंभीर आजारी असलेले पर्रीकर मुख्यमंत्रिपदाला न्याय देऊ शकत नाहीत. आम्हाला राजेशाही नको, लोकशाही पद्धतीने सरकार चालवा.' 

आपल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला बिगर शासकीय संघटना,  समविचारी राजकीय पक्ष कामगार, शेतकरी यांनीही पाठिंबा द्यावा असे आवाहन घाटे यांनी केले आहे. दरम्यान, 'नारी अधिकार' या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दिया शेटकर यांनी राज्यात बेकारी प्रचंड वाढल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, 'एकही नवी नोकरी गेल्या वर्षभरात निर्माण झालेली नाही. त्याआधी भाजपा नेत्यांनी नोकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात लाच घेऊन आपला प्रताप दाखवला आहे असा आरोपही  त्यांनी केला त्या म्हणाल्या की वीजमंत्री निलेश काब्राल यांनी  पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळात 10 ते 15 वर्षांसाठी कंत्राटी भरती केली आहे. या जागी कायमस्वरूपी भरती करता आली असती. सरकारचे याकडेच लक्ष नाही. गोवा आज कसिनोंच्या रूपाने जुगारी अड्डा बनला आहे, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताBJPभाजपा