शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ऑगस्टमध्ये मोठे राजकीय बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2024 13:34 IST

संकल्पना मंत्रिपद, सुभाष फळदेसाईंना अतिरिक्त खाते तर निलेश काब्रालना सभापतीपद शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर येत्या ऑगस्ट महिन्यात राज्यात मोठ्या राजकीय बदलांची शक्यता आहे. काँग्रेसमधून आलेल्या आमदारांपैकी संकल्प आमोणकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. तसेच मंत्री सुभाष फळदेसाई यांना अतिरिक्त खाते दिले जाऊ शकते. तर आमदार निलेश काब्राल यांना सभापतीपद बहाल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते. या दौऱ्यात त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. पक्षाध्यक्षांच्या या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अलीकडेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या वाढदिनी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना संकल्प यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असे सूतोवाच केले होते. सावंत यांनी त्यांना सुरुवातीलाच बाल भवनच्या अध्यक्षपदी नेमले होते. परंतु ते त्यावर समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांनी ताबाही घेतलेला नाही.

सप्टेंबर २०२२ मध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत यांच्यासह जे आठ काँग्रेसचे आमदार फुटले. त्यापैकी केवळ आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिमंडळात घेतले. इतर कोणालाही स्थान दिलेले नाही. संकल्प हे मुख्यमंत्र्यांचे निकटचे मानले जातात. त्यामुळे मंत्रिपदासाठी आता त्यांचेच नाव आघाडीवर आहे. दिगंबर कामत किंवा रमेश तवडकर यांच्यापैकी एकाला येत्या महिन्यात मंत्रीपद मिळू शकते, अशी माहिती मिळाली. 

मंत्र्यांवर आमदार नाराज

पूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना मनोहर पर्रीकर शुक्रवारी भाजप आमदार, मंत्र्यांची बैठक घेत असत. त्यातून संवाद वाढत असे. एकमेकांना भावना समजत असत. अलीकडे या बैठका बंद झाल्या. त्यामुळे संवाद खुंटला आणि दरी वाढली, असाच काहीसा प्रकार झाला आहे. काही मंत्री खुद्द सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांचे फोन स्वीकारत नाहीत, अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. काही मंत्री तर सचिवालयातही येत नाहीत, काही मंत्री आपली कामे करतच नाहीत असे आमदार सांगू लागले आहेत.

मुख्यमंत्र्यांना बायपास करुन मंत्री, आमदार का जातात दिल्लीला, भाजपमध्ये चर्चा

अलिकडे मुख्यमंत्र्यांना बगल देऊन काही मंत्री, आमदार दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटू लागले आहेत. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो दाबोळी उड्डाणपुलाच्या प्रश्नावर थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींना भेटले. आमदार दिगंबर कामत यांनी कोंब-मडगाव येथील रेल्वे ओव्हरबीजसाठी गडकरींची भेट घेऊन साकडे घातले. सभापती रमेश तवडकर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडकरी तसेच केंद्रीय संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली. गडकरींना त्यांनी 'श्रमधाम' उपक्रमाखाली गरिबांना मोफत देण्यासाठी बांधलेली घरे लाभार्थीना सुपूर्द करण्यासाठी निमंत्रण दिले तर शेखावत यांना काणकोणच्या लोकोत्सवासाठी आमंत्रित केले. अन्य काही आमदार व मंत्रीही अधूनमधून थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटून येत आहेत. पूर्वी असे घडत नव्हते. ही पक्षांतर्गत बेशिस्त झाली अशा प्रतिक्रिया लोक व कार्यकर्तेही व्यक्त करत आहेत.

दिल्लीत काही घडलेलेच नाही!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत राजकीय चर्चा झालेली नसल्याचे सांगितले, नजीकच्या काळात मंत्रिमंडळ फेररचना किंवा कोणतेही फेरबदल केले जाणार आहेत का? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नहा यांच्याशी याबाबतीत चर्चा झाली आहे का, असे प्रश्न केले असता ते म्हणाले की, दिल्लीत तसे काहीही घडलेले नाही. मोपा विमानतळावरील टॅक्सीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण