शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

'म्हजें घर' योजनेचा लवकरच प्रारंभ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ५० टक्के गोमंतकीयांना लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:53 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते होणार सुरुवात.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात २० कलमी कार्यक्रम, कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीमधील अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी अधिसूचना जारी केल्या जात आहेत. सर्व कायदेशीर बाबी योग्यरीत्या निकाली काढल्यानंतर अर्ज उपलब्ध करून दिले जातील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 'म्हजें घर' योजनेचा शुभारंभकरू, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'या योजनेचा फायदा गोव्यातील सुमारे ५० टक्के लोकांना होईल. सरकारने ३० वर्षांपूर्वी लोकांना पुनर्वसन करून दिलेल्या फ्लॅट्सच्या बाबतीतही आता मालकी हक्क मिळेल. वीस कलमी कार्यक्रमांतर्गत घरे नियमित करण्यासाठी सरकारने परिपत्रक जारी केले आहे. जमिनीच्या बाजारभावाच्या १/२० (एक -विसांश) मूल्य भरावे लागेल. रिक्त भूखंड सरकार ताब्यात घेईल. तत्पूर्वी, पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून ५० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. गेल्या दहा वर्षात साडेतीनशे कोटींची उलाढाल या ग्रुपनी केली. बँकांनी कोणतीही हमी नसताना कर्जे दिली"

२० कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यभरात एकूण ५,१७९ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. सरकारने दिलेल्या या जमिनीवर बांधलेली घरे नियमित करण्यासाठी आणि रिक्त भूखंड परत घेण्याची तरतूद महसूल विभागाने जारी केलेल्या या परिपत्रकातून करण्यात आली आहे. 

लाभार्थ्यांना घरांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि बँक कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळविण्यात अडचणी येत होत्या. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा विषय आला असता मुख्यमंत्र्यांनी या बांधकामांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

... तर ते भूखंड घेणार ताब्यात

वर्ग 'ब' मध्ये रिकाम्या आणि वापरात नसलेल्या भूखंडांचा समावेश आहे. २० कलमी कार्यक्रमाखाली भूखंडाचे वाटप होऊनही ताबा घेतलेला नाही किंवा घरे बांधली नाहीत व भूखंड विनावापर ठेवलेले आहेत ते सरकार ताब्यात घेणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना ते ताब्यात घेण्याचा अधिकार दिला आहे.

स्वदेशी, आत्मनिर्भरतेचा नारा

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'मोदींच्या वाढदिवसानिमित्त २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा साजरा केला जाणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांसाठी 'आदी कर्मयोगी अभियान' व 'आदी सेवा पर्व' सुरू केले आहे. आदिवासींचा उत्कर्ष हेच याचे उद्दिष्ट आहे. आदी संयोगी व आदी सखी उपक्रमांच्या माध्यमातूनही या समाजाचे सबलीकरण होणार आहे. मोदी यांनी स्वदेशी व आत्मनिर्भरतेचा नारा दिलेला आहे. लोकांनी भारत देशात उत्पादित केलेल्या वस्तूच वापराव्यात. येत्या २२ तारखेपासून जीएसटी दर सुधारणा लागू होत आहे याचा फायदा सर्वांना होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नियमितीकरणासाठी भूखंडांचे तीन श्रेणींत वर्गीकरण

भूखंडांचे नियमितीकरणासाठी विशिष्ट नियमांसह तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यास आले आहे. श्रेणी 'अ' मधील भूखंड, जिथे घरे बांधली आहेत आणि लोक त्यांच्या कुटुंबीयांसह किंवा कायदेशीर वारसांसह राहत आहेत, त्यांना सनद जारी करून वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरित केले जाईल. यासाठी वाजवी बाजार मुल्याच्या १/२० वा भार अर्जदाराने उचलावा लागेल.

वाजवी बाजारमूल्यासह दंड भरावा लागणार

वीस कलमी कार्यक्रमाखाली वर्ग 'क' मध्ये अशा प्रकरणांचा समावेश आहे, जिथे भूखंड अनधिकृतपणे तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित केले आहेत व त्यानंतर त्यांनी तेथे घरे बांधली आहेत. अशा भूखंडांच्या बाबतीत वर्ग-१ भोगवटा अंतर्गत सनदा जारी केल्या जातील. त्यासाठी वाजवी बाजार मुल्याच्या १/२० रकमेसह समतुल्य रकमेचा दंड भरावा लागेल. २८ फेब्रुवारी २०१४ पूर्वीची बांधकामेच नियमित केली जातील. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत