शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

महाराष्ट्र-गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेले तिळारी धरण भरले 98 टक्के 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:49 IST

महाराष्ट्र तसेच गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेल्या तिळारी धरणातील जलसाठा क्षमतेपर्यंत भरला असून धरणातील सध्याचा पाण्याचा साठा ९८ टक्के आहे.

म्हापसा - महाराष्ट्र तसेच गोवा सरकारने संयुक्तरित्या उभारलेल्या तिळारी धरणातील जलसाठा क्षमतेपर्यंत भरला असून धरणातील सध्याचा पाण्याचा साठा ९८ टक्के असल्याची माहिती तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता रमेश दाकटुले यांनी दिली आहे. त्यामुळे पाण्याची चिंता दूर झाली आहे.

धरणात एकूण ४४७.२ दशलक्ष घन मीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने तसेच मागील काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे धरण क्षमतेपर्यंत भरल्याचे ते म्हणाले. धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. तिळारी प्रकल्पातून गोव्याला ७३.३ टक्के तर महाराष्ट्राला २६.७ टक्के पाण्याचा पुरवठा करण्यात येत असतो. परिसरात जास्त प्रमाणावर पाऊस पडला नसल्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागला नाही; पण पावसाळ््यात अचानकपणे पाऊस वाढल्यास धरण भरण्याची शक्यता असते त्यामुळे ठरावीक कालावधीत पाणी बाहेर सोडावे लागते. या वर्षी सुद्धा पावसाळ्यात धरणातून पाणी बाहेर सोडण्यात आल्याची माहिती रमेश दाकटुले यांनी दिली. सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा पुढील वर्षी पावसाळा सुरु होईपर्यंत मुबलक असा आहे. 

पावसाळ्याचा हंगाम संपल्यात जमा असला तरी आॅक्टोबरच्या शेवटीपर्यंत पावसाच्या सरी अधून मधून कोसळत असतात. त्यामुळे धरणातून पाणी सोडणे शक्य होत नाही. तसेच नोव्हेंबर महिन्यात कालव्यांची दुरुस्ती हाती घ्यावयाची असल्याने अंदाजीत दिड महिन्यासाठी दोन्ही राज्यांना धरणातून होणारा पुरवठा बंद ठेवण्यात येतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबराच्या शेवटी धरणातून पुरवठा सुरु करण्यात येत असतो. 

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागा बरोबर उत्तर गोव्यातील बार्देस, पेडणे तसेच डिचोली हे तीन तालुके या धरणावर अवलंबून आहेत. गोव्यात कृषी सिंचना बरोबर उत्तर गोव्यातील अस्नोडा तसेच चांदेल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला यातून पुरवठा होत असतो. या जलशुद्धीकरण प्रकल्पातून लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. ज्या काळात तिळारी धरणातून पुरवठा बंद असतो त्या काळात जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते.  

टॅग्स :goaगोवा