शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत कर्मचाऱ्यांच्या रेशनकार्डवर गदा; ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाचा सरकारचा निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:23 IST

वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रेशनकार्डे परत करावी लागतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वार्षिक ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रेशनकार्डे परत करावी लागतील. त्यांना यापुढे रेशनचा लाभ मिळणार नाही. तसेच वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सरकारी सेवकांनी अती गरिबांसाठीची घेतलेली पीएचएच कार्डे परत करून एपीएल कार्डे घ्यावी लागतील.

मंगळवारी नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर तसेच निरीक्षक, उपनिरीक्षक व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. सध्या किती रेशनकार्डे अस्तित्वात आहेत? किती कार्डधारक स्वस्त धान्य दुकानांमधून रेशन उचलतात, याची माहिती मंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. नागरी पुरवठा खात्याने रेशनवरील धान्याच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गंभीर दखल घेऊन प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी सुरू केली. तेव्हा असे आढळले की, खुद्द काही सरकारी कर्मचाऱ्यांनी चांगला पगार असूनही गरिबांसाठीची पीएचएच (प्रायोरिटी हाउसहोल्ड) रेशनकार्डे घेतली आहेत आणि ते धान्य लाटत आहेत. असे सुमारे १० हजार सरकारी कर्मचारी आहेत.

सरकारी सेवेत शिपायालादेखील आजकाल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चांगला पगार मिळतो. रेशनवरील धान्याचा लाभ गरीब कुटुंबांऐवजी सरकारी कर्मचारी लाटत असल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडील पीएचएच कार्डे परत करून एपीएल म्हणजेच दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांसाठी असलेली रेशनकार्ड घ्यावीत, असे आवाहन केले जाणार आहे.

८२ हजार कार्डे निलंबित 

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांच्या काळात रेशनवरील धान्य कोटा न उचललेल्यांची रेशनकार्ड निलंबित करण्याची प्रक्रिया चालू महिन्यापासूनच सुरु झाली आहे. आतापर्यंत सुमारे ८२ हजार कार्डे निलंबित केलेली आहेत.

प्रत्येक खात्याला पत्र पाठवणार : संचालक

खात्याचे संचालक गोपाळ पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील महत्त्वाचे निर्णय झाले असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना रेशनकार्डे परत करावी लागतील, असे त्यांनी सांगितले. अशा कर्मचाऱ्यांची संख्या किती असेल? असे विचारले असता ते आताच सांगणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. प्रत्येक खात्याला पत्र लिहून या निर्णयाबाबत माहिती दिली जाईल.

...असू शकतात सरकारी कर्मचारी

अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यापासून बीपीएल रेशनकार्डे बंद झालेली आहेत. एएवाय, पीएचच कार्डे दिली जातात. राज्यात सध्या १,३०,५५९ पीएचएच कार्डे असून लाभार्थीची संख्या ४,९९,६१८ आहे. यातील अनेकजण सरकारी कर्मचारी असू शकतात.

म्हणून झाला निर्णय...

गेल्या नोव्हेंबरमध्ये पोलिसांच्या क्राइम ब्रँचने नागझर, कुर्टी येथे खासगी गोदामावर धाड टाकून तस्करीचा तांदूळ, गहू जप्त केला होता. बेळगावकडे जाणारा ट्रक पकडून तांदळाच्या १२७ पोती व गव्हाची १७० पोती जप्त केली होती. हे धान्य रेशन दुकानांना पुरविले जाणारे होते. त्याची तस्करी झाल्याचा संशय होता. काही रेशन दुकानदार तसेच काही रेशनकार्डधारकही धान्य बाहेर काळ्याबाजारात विकतात, असे खात्याला प्राथमिक चौकशीत आढळले. त्या अनुषंगाने ज्यांना खरी गरज आहे, त्यांनाच स्वस्त धान्य दुकानांमध्ये माफक दरात रेशन मिळावे, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवरच सरकारी कर्मचायांबाबत हा निर्णय झाला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा