शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लोकोत्सव अडचणीत; महापालिकेने परवानगी नाकारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 21:28 IST

अग्निशामक दल, वाहतूक विभागाची आधी परवानगी आणण्याची अट

पणजी : शहरात दरवर्षी होणारा लोकोत्सव महापालिकेने परवानगी नाकारल्याने यंदा अडचणीत आला आहे. मनपाने ताठर भूमिका घेताना आयोजक कला व संस्कृती खात्याने अग्निशामक दल, वाहतूक विभागाची आधी परवानगी आणावी, पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृहे, कचरा व्यवस्थापन याचा आराखडा सादर करावा, अशा अटी घातल्या आहेत. येत्या शुक्रवार १0 पासून दर्यासंगमावर लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महापौर उदय मडकईकर म्हणाले की, ‘महापालिकेने परवानगी नाकारण्यामागे काही कारणे आहेत ती अशी की, यावेळी स्टॉल्सची संख्या ५00 वरुन वाढवून ७५0 करण्यात आली आहे. या स्टॉल्सधारकांसाठी केवळ १५ प्रसाधनगृहे दाखवलेली आहेत. परराज्यातील कारागिरांना २00 स्टॉल्स दिले जाणार आहेत. प्रत्येक स्टॉलवर किमान दोन माणसे धरली तरी ४00 लोक झाले. नैसर्गिक विधीसाठी त्यांना १५ प्रसाधनगृहे अपुरी पडतील. आयोजकांनी वाहनांची पार्किंग व्यवस्थाही नीट केलेली नाही. लोकोत्सवाच्यावेळी वाहतूक कोंडी होत असल्याने कांपालवासीयांच्या आधीच वाढत्या तक्रारी आहेत.’लोकोत्सवात दाटवाटीने स्टॉल्स लावले जातात त्यामुळे आगीचाही धोका असतो. अग्निशामक दलाकडून परवानगी आवश्यक आहे, असे मडकईकर म्हणाले. 

दरम्यान, लोकोत्सवाच्या काळात वाहतूक तसेच पार्किंगच्या विषयावर पोलिस तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौर म्हणाले की, ‘खरे तर दर्यासंगमऐवजी यंदा लोकोत्सव कांपाल येथे परेड मैदानावर भरविला जावा, असे आमचे म्हणणे होते परंतु २६ जानेवारीच्या संचलनानिमित्त आधी काही दिवस परेड मैदानाची गरज पोलिसांना भासते त्यामुळे हे शक्य झाले नाही. 

टॅग्स :goaगोवा