शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पहली बार, लोकसभेसाठी मतदान; 'ही' जमात पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:30 IST

आतापर्यंत मतदानापासून वंचित राहिलेली जमात करणार मतदान

पणजी : राजधानी शहरापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या निरंकाल, दाभाळ येथील वानरमाऱ्यांना लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी प्रथमच प्राप्त झाली आहे. शिरोडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीही त्यांना मतदान करता येईल. ही जमात मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिली होती. काही जागरुक नागरिकांनी पुढाकार घेऊन २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी प्रथमच ही जमात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून मतदान करणार आहे. निरंकाल येथे सुमारे 100 वानरमारे असून 40 जणांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. यात 20 महिलांचा समावेश आहे. २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शंभर टक्के मतदान केले होते. लोकसभेसाठी ते प्रथमच मतदान करणार आहेत. वानरांना मारणारी ही जमात दाट जंगलात वास्तव्य करुन होती. नंतर ती निरंकाल येथे स्थायिक झाली. सामाजिक कार्यकर्ते दिवंगत सतिश सोनक आणि कृषीतज्ञ सतीश तेंडुलकर आदींनी पुढाकार घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. त्यांना रेशन कार्डे मिळवून देण्यात अनेक वर्षे गेली. आधार कार्ड तसेच मतदार कार्डे मिळवून देण्यातही बऱ्याच अडचणी आल्या. वन्य प्राणी संवर्धन कायदा लागू झाल्यानंतर वन्य प्राण्यांच्या हत्त्येवर निर्बंध आले. त्यामुळे या वानरमाऱ्यांचा व्यवसाय बुडाला. लोकसभेसाठी प्रथमच मतदान करणार असलेले गोपाळ वसंत पोवार यांनी आपण मतदान करण्यासाठी अगतिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आजपर्यंत मतदान म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नव्हते. मुख्य प्रवाहापासून आम्ही दूर आणि वंचितच होतो. लोकसभा निवडणुकीत अपेक्षा विचारल्या असता एका ६५ वर्षीय ज्येष्ठ वानरमाऱ्याने सांगितले की, स्वच्छतागृहे आणि वीज पुरवठा या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. वानरमाऱ्यांच्या मुलांना शाळा प्रवेशासाठीही अनेक अडचणी आल्या. कारण जंगलात जन्म झाल्याने जन्म नोंदणी झालीच नाही आणि जन्मतारखांबाबतही पालक अनभिज्ञ आहेत. मात्र शिक्षण हक्क कायद्याखाली (आरटीई) या मुलांची शैक्षणिक अडचणही दूर करण्यात आली, असे तेंडुलकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९goaगोवाVotingमतदान