शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पहली बार, लोकसभेसाठी मतदान; 'ही' जमात पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:30 IST

आतापर्यंत मतदानापासून वंचित राहिलेली जमात करणार मतदान

पणजी : राजधानी शहरापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या निरंकाल, दाभाळ येथील वानरमाऱ्यांना लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी प्रथमच प्राप्त झाली आहे. शिरोडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीही त्यांना मतदान करता येईल. ही जमात मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिली होती. काही जागरुक नागरिकांनी पुढाकार घेऊन २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी प्रथमच ही जमात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून मतदान करणार आहे. निरंकाल येथे सुमारे 100 वानरमारे असून 40 जणांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. यात 20 महिलांचा समावेश आहे. २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शंभर टक्के मतदान केले होते. लोकसभेसाठी ते प्रथमच मतदान करणार आहेत. वानरांना मारणारी ही जमात दाट जंगलात वास्तव्य करुन होती. नंतर ती निरंकाल येथे स्थायिक झाली. सामाजिक कार्यकर्ते दिवंगत सतिश सोनक आणि कृषीतज्ञ सतीश तेंडुलकर आदींनी पुढाकार घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. त्यांना रेशन कार्डे मिळवून देण्यात अनेक वर्षे गेली. आधार कार्ड तसेच मतदार कार्डे मिळवून देण्यातही बऱ्याच अडचणी आल्या. वन्य प्राणी संवर्धन कायदा लागू झाल्यानंतर वन्य प्राण्यांच्या हत्त्येवर निर्बंध आले. त्यामुळे या वानरमाऱ्यांचा व्यवसाय बुडाला. लोकसभेसाठी प्रथमच मतदान करणार असलेले गोपाळ वसंत पोवार यांनी आपण मतदान करण्यासाठी अगतिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आजपर्यंत मतदान म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नव्हते. मुख्य प्रवाहापासून आम्ही दूर आणि वंचितच होतो. लोकसभा निवडणुकीत अपेक्षा विचारल्या असता एका ६५ वर्षीय ज्येष्ठ वानरमाऱ्याने सांगितले की, स्वच्छतागृहे आणि वीज पुरवठा या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. वानरमाऱ्यांच्या मुलांना शाळा प्रवेशासाठीही अनेक अडचणी आल्या. कारण जंगलात जन्म झाल्याने जन्म नोंदणी झालीच नाही आणि जन्मतारखांबाबतही पालक अनभिज्ञ आहेत. मात्र शिक्षण हक्क कायद्याखाली (आरटीई) या मुलांची शैक्षणिक अडचणही दूर करण्यात आली, असे तेंडुलकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९goaगोवाVotingमतदान