शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
3
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
4
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
5
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
6
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
7
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
8
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
9
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
10
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
11
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
12
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
13
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?
14
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
15
तूर्त अभय! माणिकराव कोकाटेंना शनिदेवच पावला; अजित पवारांनी सुनावले, पण मंत्रीपद कायम ठेवले
16
IND vs ENG 5th Test India Playing XI : करुण नायरला 'वन मोअर चान्स'; टीम इंडियात ४ बदल
17
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
18
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
19
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
20
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर

श्रीपादभाऊंचा ज्योक भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2024 09:22 IST

२०२९ साल कुणी पाहिले आहे? त्यापूर्वी व त्यावेळी काय घडेल, याची कल्पना आताच कुणी करू शकत नाही, जग झपाट्याने बदलतेय.

- मगन कळलावे

२०२९ साल कुणी पाहिले आहे? त्यापूर्वी व त्यावेळी काय घडेल, याची कल्पना आताच कुणी करू शकत नाही, जग झपाट्याने बदलतेय. आपले उत्तर गोव्याचे श्रीपादभाऊ यांना काय विनोदबुद्धी सुचली कोण जाणे, पण म्हापशात काल त्यांनी भलतेच विधान केले. नुकतेच कुठे २०२४ साल सुरू झाले आहे आणि भाऊ चक्क २०२९ सालाविषयी बोलले. २०२९ मध्ये जी लोकसभा निवडणूक येईल, त्या निवडणुकीवेळी उत्तर गोव्यात भाजपने नवा युवा उमेदवार द्यावा, असे भाऊंनी सुचविले आहे.

उत्तर गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे आणखी किती मनोरंजन करणार 'भाऊ? २०२९ साल यायला आणखी पाच वर्षे आहेत. तत्पूर्वी मांडवी आणि जुवारी नदीतून बरेच पाणी वाहून जाईल. कदाचित श्रीपादभाऊंना २०२९ मध्ये वाटू शकते की, आपण अजून युवा आहे, असे काही कार्यकर्ते विनोदाने बोलतात. २०२९ मध्ये भाजपने नवा युवा उमेदवार द्यावा, असे केंद्रीय राज्यमंत्री असलेले भाऊ सुचवतात. मग आताच नवा युवा उमेदवार उत्तर गोव्यासाठी का नको, असा प्रश्न आरजीवाले विचारतात म्हणे, आरजीतर्फे मनोज परब रिंगणात उतरले आहेतच. २०२९ पर्यंत नव्या युवा उमेदवारासाठी लोकांनी का थांबावे? मतदारांसमोर आताच नव्या युवा उमेदवाराचा पर्याय नको काय?

श्रीपादभाऊंचे नशीब की यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे तिकीट कापले नाही. अनेक विद्यमान खासदारांना यावेळी तिकीट गमवावे लागत आहे. दिल्लीचे डॉ. हर्षवर्धन हे एकेकाळी भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते. त्यांना यावेळच्या निवडणुकीसाठी गुडबाय केले गेले आहे, आपल्याला तिकीट नको, असे यावेळी त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सांगितले आहे. कारण त्यांना तिकीट मिळणार नाही, हे कळाले होते.

श्रीपादभाऊंना आमच्यामुळे तिकीट मिळाले, असे म्हणे सदानंदराव तानावडे सध्या बार्देश तालुक्यात आपल्या काही खास माणसांना सांगतात. तसे सांगताना तानावडेंच्या चेहऱ्यावर खास हास्य विसावते. दक्षिण गोव्यात पुरुष उमेदवार नको, एखाद्या महिलेला तिकीट द्यावे, असे पंतप्रधान मोदी यांनी सुचविले. मोदींचा हा आदेश ऐकून मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे या दोघांच्याही तोंडचे पाणी पळाले. बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर वगैरे तर घामाघूम झाले आहे. 'हेची फळ का मम तपाला', असे नरेंद्रबाब विचारतात. दामू नाईक बिचारे थांबलेत की, यापुढे भाजप प्रदेशाध्यक्षपद तरी मिळेल. तानावडे मात्र राज्यसभा खासदार झाले तरी प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तसे मनातून तयार नाहीत. असो, त्यालाच त्याग म्हटले श्रीपादभाऊ जाते. एरव्ही त्यागाच्या गोष्टी करतात. देशासाठी त्याग करायला हवा, असा सल्ला ते युवकांना देतात. मात्र भाऊंनी यावेळी आपल्याला तिकीट मिळायलाच हवे म्हणून आकाशपाताळ एक केले.

पाच लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर व केंद्रात मंत्रिपदही अनुभवल्यानंतर सत्तेची नशा काय असते, हे भाऊंना कळाले आहे. त्याग वगैरे नंतर पाहू. तरी बरे श्रीपादभाऊ २०२९ साली त्याग करणार आहेत. त्यावेळी नवा युवा उमेदवार भाजपने द्यायला हवा म्हणे, आता २०२९ साली दयानंद सोपटे, दया मांद्रेकर किंवा आपले दिलीप परुळेकर तरी युवावस्थेत असतील काय? परुळेकर आताच थकलेले आहेत.

आपली यावेळची निवडणूक ही शेवटची आहे, असे अनेक राजकारणी सांगत असतात. एकदा लोकांचे मतदान झाले की, मग भाषा बदलली जाते. यावेळी आपण अखेरची लोकसभा निवडणूक लढवतोय, असे भाऊ थेट बोलले नाहीत. पण २०२९ मध्ये तुम्ही नवा उमेदवार शोधा, असे भाऊंनी सुचवले आहे. पूर्वी स्व. मनोहर पर्रीकर वगैरे सांगायचे की, २०१२ च्या निवडणुकीनंतर आपण राजकारणातून रिटायर होणार आहे. मात्र तसे काही घडले नाही. रिटायर होऊन आपण शेती करीन, असे भाई सांगायचे. अर्थात तसे बोलायचे असते हे भाईंना ठाऊक होते. प्रतापसिंग राणे यांनी अकरा निवडणुका लढविल्या व जिंकल्या, तरी बारावी म्हणजे २०२२ ची निवडणूक लढवायची त्यांना इच्छा होतीच की. 

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा