शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपादभाऊंचा ज्योक भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2024 09:22 IST

२०२९ साल कुणी पाहिले आहे? त्यापूर्वी व त्यावेळी काय घडेल, याची कल्पना आताच कुणी करू शकत नाही, जग झपाट्याने बदलतेय.

- मगन कळलावे

२०२९ साल कुणी पाहिले आहे? त्यापूर्वी व त्यावेळी काय घडेल, याची कल्पना आताच कुणी करू शकत नाही, जग झपाट्याने बदलतेय. आपले उत्तर गोव्याचे श्रीपादभाऊ यांना काय विनोदबुद्धी सुचली कोण जाणे, पण म्हापशात काल त्यांनी भलतेच विधान केले. नुकतेच कुठे २०२४ साल सुरू झाले आहे आणि भाऊ चक्क २०२९ सालाविषयी बोलले. २०२९ मध्ये जी लोकसभा निवडणूक येईल, त्या निवडणुकीवेळी उत्तर गोव्यात भाजपने नवा युवा उमेदवार द्यावा, असे भाऊंनी सुचविले आहे.

उत्तर गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे आणखी किती मनोरंजन करणार 'भाऊ? २०२९ साल यायला आणखी पाच वर्षे आहेत. तत्पूर्वी मांडवी आणि जुवारी नदीतून बरेच पाणी वाहून जाईल. कदाचित श्रीपादभाऊंना २०२९ मध्ये वाटू शकते की, आपण अजून युवा आहे, असे काही कार्यकर्ते विनोदाने बोलतात. २०२९ मध्ये भाजपने नवा युवा उमेदवार द्यावा, असे केंद्रीय राज्यमंत्री असलेले भाऊ सुचवतात. मग आताच नवा युवा उमेदवार उत्तर गोव्यासाठी का नको, असा प्रश्न आरजीवाले विचारतात म्हणे, आरजीतर्फे मनोज परब रिंगणात उतरले आहेतच. २०२९ पर्यंत नव्या युवा उमेदवारासाठी लोकांनी का थांबावे? मतदारांसमोर आताच नव्या युवा उमेदवाराचा पर्याय नको काय?

श्रीपादभाऊंचे नशीब की यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे तिकीट कापले नाही. अनेक विद्यमान खासदारांना यावेळी तिकीट गमवावे लागत आहे. दिल्लीचे डॉ. हर्षवर्धन हे एकेकाळी भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते. त्यांना यावेळच्या निवडणुकीसाठी गुडबाय केले गेले आहे, आपल्याला तिकीट नको, असे यावेळी त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सांगितले आहे. कारण त्यांना तिकीट मिळणार नाही, हे कळाले होते.

श्रीपादभाऊंना आमच्यामुळे तिकीट मिळाले, असे म्हणे सदानंदराव तानावडे सध्या बार्देश तालुक्यात आपल्या काही खास माणसांना सांगतात. तसे सांगताना तानावडेंच्या चेहऱ्यावर खास हास्य विसावते. दक्षिण गोव्यात पुरुष उमेदवार नको, एखाद्या महिलेला तिकीट द्यावे, असे पंतप्रधान मोदी यांनी सुचविले. मोदींचा हा आदेश ऐकून मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे या दोघांच्याही तोंडचे पाणी पळाले. बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर वगैरे तर घामाघूम झाले आहे. 'हेची फळ का मम तपाला', असे नरेंद्रबाब विचारतात. दामू नाईक बिचारे थांबलेत की, यापुढे भाजप प्रदेशाध्यक्षपद तरी मिळेल. तानावडे मात्र राज्यसभा खासदार झाले तरी प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तसे मनातून तयार नाहीत. असो, त्यालाच त्याग म्हटले श्रीपादभाऊ जाते. एरव्ही त्यागाच्या गोष्टी करतात. देशासाठी त्याग करायला हवा, असा सल्ला ते युवकांना देतात. मात्र भाऊंनी यावेळी आपल्याला तिकीट मिळायलाच हवे म्हणून आकाशपाताळ एक केले.

पाच लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर व केंद्रात मंत्रिपदही अनुभवल्यानंतर सत्तेची नशा काय असते, हे भाऊंना कळाले आहे. त्याग वगैरे नंतर पाहू. तरी बरे श्रीपादभाऊ २०२९ साली त्याग करणार आहेत. त्यावेळी नवा युवा उमेदवार भाजपने द्यायला हवा म्हणे, आता २०२९ साली दयानंद सोपटे, दया मांद्रेकर किंवा आपले दिलीप परुळेकर तरी युवावस्थेत असतील काय? परुळेकर आताच थकलेले आहेत.

आपली यावेळची निवडणूक ही शेवटची आहे, असे अनेक राजकारणी सांगत असतात. एकदा लोकांचे मतदान झाले की, मग भाषा बदलली जाते. यावेळी आपण अखेरची लोकसभा निवडणूक लढवतोय, असे भाऊ थेट बोलले नाहीत. पण २०२९ मध्ये तुम्ही नवा उमेदवार शोधा, असे भाऊंनी सुचवले आहे. पूर्वी स्व. मनोहर पर्रीकर वगैरे सांगायचे की, २०१२ च्या निवडणुकीनंतर आपण राजकारणातून रिटायर होणार आहे. मात्र तसे काही घडले नाही. रिटायर होऊन आपण शेती करीन, असे भाई सांगायचे. अर्थात तसे बोलायचे असते हे भाईंना ठाऊक होते. प्रतापसिंग राणे यांनी अकरा निवडणुका लढविल्या व जिंकल्या, तरी बारावी म्हणजे २०२२ ची निवडणूक लढवायची त्यांना इच्छा होतीच की. 

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा