शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला कोण सुरुंग लावणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:08 IST

सासष्टीत प्रभाव निर्माण करण्यासाठी भाजप, आरजीचा खटाटोप

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला. आतापर्यंत सासष्टी तालुक्यानेच काँग्रेसला तारले आहे. मात्र, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे आरजी व भाजपकडून आटोकाट प्रयत्न चालू आहेत.या तालुक्याचा आढावा घेतल्यास यंदा येथील मतदार काँग्रेसबरोबर राहण्याची शक्यता तशी धूसर आहे. त्यांचा कल आरजीकडे वळू लागला आहे.

दिगंबर कामत व आलेक्स सिक्वेरा हे आता भाजपमध्ये आहेत. सिक्वेरा यांना तर मंत्रिपदही मिळाले आहे. आरजीने गत विधानसभा निवडणुकीत सासष्टीत बऱ्यांपैकी मते प्राप्त करताना काँग्रेसला शह दिला होता. लोकसभा निवडणुकीत सासष्टीची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरणार आहे.

सासष्टी हा ख्रिस्ती अल्पसंख्याक बहुल तालुका आहे. मात्र, आता या समाजातील अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यातच मतदारसंघ फेररचनेमुळे या तालुक्यातील काही मतदारसंघाचे धुव्रीकरणही झाले आहे. नुवे, बाणावली व काही प्रमाणात वेळ्ळी मतदारसंघापुरतेच खिस्ती लोकांचे वर्चस्व अजूनही आहे. 

मागच्या खेपेला दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दीन यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी एकूण २०,१५६१ मते मिळविली होती. सार्दीन यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर पुन्हा एकदा आपण दक्षिणेतून निवडणूक लढवू व ही आपली आयुष्याची शेवटची निवडणूक असेल, अशी भावनात्मक भाषा यापूर्वीच ते बोलूनही गेले आहेत.

सार्दिनकडे युवा मतदार वळणार?

सार्दीन हा जुना चेहरा आहे. त्यांचे आता वयही झाले आहे. मात्र, त्यांना मानणारा एक वर्ग अजूनही सासष्टीत आहे. त्यांचा तसा लोकसंपर्कही चांगला आहे. या त्यांच्या काही जमेच्या गोष्टी आहेत. मात्र, आजचा युवा मतदार त्यांना जवळ करणार का? हा मोठा प्रश्न आहे.

मतदार मागे राहणार का?

मडगाव, फातोर्डा व नावेली मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. काँग्रेसकडे उमेदवार असले तरी या पक्षाचे कुठलेही संघटनात्मक काम या तालुक्यात दिसत नाहीत. त्यामुळे मतदार त्यांच्या मागे राहणार का? हाही एक प्रश्न आहे.

गिरीश, एल्वीस यांचीही नावे चर्चेत

गिरीश चोडणकर व एल्वीस गोम्स हेही सासष्टीचे आहेत. या दोघांनाही निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. पराभव झालेला असला तरी हे दोघेही राजकारणात अजूनही सक्रिय आहेत. गिरीशने तर आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. ख्रिस्ती लोकांमध्येही त्यांच्याबाबत चांगले मत आहे. त्याचा लाभ करून घेण्यात ते यशस्वी ठरतील का?, गोम्स स्वतः ख्रिस्ती आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर अल्पसंख्यक मते खेचू शकतात का, तेही पाहावे लागेल.

अल्पसंख्याक याही खेपेला काँग्रेसच्या बाजूने

सासष्टी तालुक्यातील अल्पसंख्याक याही खेपेला काँग्रेसच्या बाजूने राहणार, त्यांना पर्याय नाही. काँग्रेस हाच भाजपचा विरोधी पक्ष आहे. भाजपने कितीही विकासकामे केली असल्याचे सांगितले तरी कुठल्याही पक्षाचे सरकार असो ते विकासकामे करणारच. भाजप हिंदुत्व ही राष्ट्रीय संस्कृती मानत आहे. जो त्यांच्याविरोधात बोलतो ते अराष्ट्रीय, आमच्या गोव्याची व देशाची विविधता ही आमची संस्कृती आहे, आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. - प्रभाकर तिंबले, राजकीय विश्लेषक.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा