शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : साऱ्यांचे लक्ष सासष्टीकडे का लागलेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 22:46 IST

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान.

- राजू नायक

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान. या निवडणुकीत सासष्टीत भरघोस मतदान झाले. जरी २०१४ मध्ये या तालुक्यात ७१. ३६ टक्के मतदान झाले असले तरी या वेळी ते ६९.९ टक्के झाले आहे.

या तालुक्यात विधानसभेचे सात मतदारसंघ येतात व त्यामध्ये मडगाव व फातोर्डा वगळता इतर भागांमध्ये ख्रिश्चनांचे मोठे प्राबल्य आहे. मडगावमध्ये ७१. ७ टक्के मतदान झाले असून २०१४ मध्ये या शहरात ७३. ३ टक्के मतदान झाले होते. या वेळी झालेले कमी मतदान म्हणजे काँग्रेसबद्दल नाराजी आहे का, याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा चालू असली तरी सासष्टीतील ७० टक्के म्हणजेच 1,63,००० मतेच काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना विजयासाठीचे मताधिक्य मिळवून देतील, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे.

भाजपालाही सासष्टीतील ख्रिस्ती समाजाच्या एकगठ्ठा मतांची भीती वाटत होती, ती खरी ठरली आहे. ख्रिस्ती मतदारांमध्ये आम आदमी पक्षही लोकप्रिय आहे. या पक्षाने एल्विस गोम्स या माजी मुलकी अधिका-याला उमेदवारी दिली होती व ते काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्यापेक्षा तरुण व होतकरू असल्याने त्यांच्या पक्षात उत्साह होता. परंतु ‘आप’ला मत म्हणजे भाजपाला मत असेच समीकरण बनले व ख्रिश्चनांनी भाजपाला हरवण्याचा चंगच बांधल्याने त्यांनी एकगठ्ठा मते काँग्रेसला टाकली असे मानले जाते.

तज्ज्ञांच्या मते, २०१४ मध्ये भाजपाला कधी नव्हे ती मोदी लाटेमध्ये ५० हजार मते सासष्टीत प्राप्त झाली होती. नुवेसारख्या मतदारसंघात जेथे संपूर्ण ख्रिस्ती लोकसंख्या आहे, जेथे एरव्ही भाजपाला हजारभर मतेच मिळतात, तेथे त्यांना २०१४ मध्ये चार हजारांहून अधिक मते प्राप्त झाली होती. निरीक्षक मानतात की या निवडणुकीत भाजपाला तेवढीच ५० हजार मते प्राप्त झाली तरीसुद्धा ते निवडणुकीत पैलतीर गाठू शकणार नाहीत, कारण काँग्रेसच्या मतांचा फरक प्रचंड असेल. या तालुक्यात एक लाख ६३ हजारांचे मतदान झाले असून ‘आप’ (ज्यांची मते २० हजारांहून अधिक असणार नाहीत) व भाजपाची ५० हजार मते वजा केली तर काँग्रेस पक्षाला ८० हजारांहून जादा मते मिळविण्यापासून कोणी अडवू शकणार नाही.

काँग्रेस पक्षाची सूत्रे मान्य करतात की मडगाव व केपे या मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी जोरदार कार्य केले असले तरी इतर ठिकाणचे मताधिक्य भाजपाला मिळूनही तो पक्ष सासष्टीचा फरक भरून काढू शकणार नाही. काणकोण, सांगे, सावर्डे, कुडचडे, मुरगाव अशा काही मतदारसंघांमध्ये भाजपाने चांगले कार्य करूनही ते सासष्टीतील फरक पुसून काढू शकणार नाहीत. शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने फोंडा तालुक्यात दिलेला हात काही प्रमाणात मताधिक्य वाढवायला काँग्रेसला मदत करणार आहे. खाणपट्टय़ातही काँग्रेसला किंचित लाभ होईल. या ख्रिस्ती पाठिंब्यामुळे गेली पाच वर्षे जे अक्षरश: विजनवासात गेले होते ते फ्रान्सिस सार्दिन यांना पुन्हा ‘राजयोग’ प्राप्त झाला तर नवल नाही.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

टॅग्स :Goa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक 2019goaगोवाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक