शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

गोव्यातील नद्यांचे राष्ट्रीयीकरण रद्द करण्यासाठी काँग्रेसचे नितीन गडकरी यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 19:02 IST

गोव्यात होऊ घातलेल्या सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला सर्व स्तरांतून वाढता विरोध होत असतानाच या प्रकल्पाला गोव्यातील काँग्रेसनेही विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी करणारे पत्र गोव्यातील काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.

मडगाव :  गोव्यात होऊ घातलेल्या सहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला सर्व स्तरांतून वाढता विरोध होत असतानाच या प्रकल्पाला गोव्यातील काँग्रेसनेही विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी करणारे पत्र गोव्यातील काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नद्यांचे राष्ट्रीयीकरण केल्यास या नद्यांच्या काठावर रहाणा-या मच्छीमारांच्या अधिकारावर गदा येणार असून त्यामुळेच हा लोकविरोधी निर्णय रद्द करावा अशी मागणी केली आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापर्यंत या मागणीवर केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा कवळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. अन्यथा काँग्रेस आपले पुढील धोरण स्पष्ट करणार असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे आमदार व प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही उपस्थित होते. गोव्यातील झुवारी व मांडवी या दोन प्रमुख नद्यांसह एकूण सहा नद्यांचे जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण होणार असून आतार्पयत गोव्यातील 190 पैकी 90 पंचायतींच्या ग्रामसभांमध्ये या निर्णयाला तसेच कोळसा हबला विरोध केलेला आहे. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळाने आपली अधिकृत भूमिका केंद्रीय मंत्री गडकरी यांना कळविली आहे. सोमवारी स्पीडपोस्टने हे पत्र पाठविल्याची माहिती कवळेकर यांनी दिली. गोव्यात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली कोळशाच्या वाहतूकीला उत्तेजन देण्याचे कारस्थान शिजत असल्याचा संशय व्यक्त करीत यामुळे संपूर्ण राज्यात लोकांमध्ये एकप्रकारचे साशंकतेचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव पुढे नेल्यास गोव्यात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा रस्ता रुंदीकरणाला विरोध नाही मात्र हे रुंदीकरण नेमके कशासाठी केले जाते हे लोकांना कळले पाहिजे. या प्रश्नात काँग्रेस लोकांबरोबर राहील असे कवळेकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा