शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

जुने-नवे भेद न करता पक्षासाठी एकदिलाने काम करू; भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:08 IST

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही केले वाळपईतील पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगावः समाजातील शेवटचा घटकापर्यंत अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी पोहोचाव्यात म्हणून प्रधानमंत्री १८ तास काम करतात. त्यांच्या कामापासून ऊर्जा घेऊन तळागाळातील मंडळ समिती, बूथ समिती पदाधिकाऱ्यांनी कार्यरत व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण व्हावे म्हणून मावळ्यांना बरोबर घेऊन अन्यायाचा प्रतिकार केला. तसेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. जुने नवे असा भेद न करता कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत रहावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी वाळपई येथे केले.

वाळपई नगरपालिका सभागृहामध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दयानंद कारबोटकर, आशिष शिरोडकर, रुपेश कामत, वाळपई मंडळ अध्यक्ष रामू खरवत, विनोद शिंदे, प्रसाद खाडिलकर, मिलिंद गाडगीळ, नगराध्यक्ष प्रसन्न गावस, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच, नगरसेवक, नवीन समिती सदस्य उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघातून भाजपची स्थापना केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी, तळागाळापर्यंत नेण्यासाठी अविरत श्रम घेतले. तसेच गोव्यामध्ये श्रीपाद नाईक, मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर यांच्यासारख्या नेत्यांनी प्रवासाची कोणतीही साधने किंवा सुख सोयी नसताना संपूर्ण राज्यभर प्रवास करून पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्रम घेतले. तुलनेने आज सामान्य कार्यकर्त्याला आधुनिक साधनांमुळे पक्ष कार्य करणे सोपे झालेले आहे. पूर्वी जेव्हा आम्ही पक्ष कार्यासाठी घरोघरी पायी चालत जात होतो. त्यावेळी थट्टा केली जात होती.

सुरुवातीस ढोलताशांच्या गजरात प्रदेशाध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलन व भाजपाचे संस्थापक दीनदयाळ उपाध्याय व शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक नूतन समिती अध्यक्ष रामू खरवत यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद गाडगीळ यांनी केले. तर रामनाथ डांगी यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या स्वप्नातील भारत साकारूया: मंत्री राणे

यावेळी बोलताना आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, दामू नाईक यांच्या सारखा सामान्य आणि बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता पक्षाला अध्यक्ष म्हणून मिळाला आहे. त्याचा फार आनंद आहे. त्यांच्या कारकिर्दीत येणाऱ्या कार्यकाळामध्ये राज्यात पक्ष मजबूत होईल यात शंका नाही. विकास कामे होत आहेत, होतच राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, एक दिलाने पक्ष कार्य करून संघटना मजबूत करुया अंत्योदय तत्त्वाने समाजातील वंचित घटकापर्यंत सरकारच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याची वचनबद्ध होऊया. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण