शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विकसित भारतासाठी कृषी क्षेत्र बळकट करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:26 IST

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बैठकीत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'विकसित भारत' या संकल्पनेला गती देण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्यावर राज्य सरकार भर देत असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय बैठकीत त्यांनी व्हर्चुअल पद्धतीने सहभाग घेत हा मुद्दा ठामपणे मांडला.

देशातील विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कृषी क्षेत्रातील आव्हाने, धोरणात्मक उपाययोजना आणि नवकल्पना यावर सविस्तर चर्चा झाली. गोव्याच्या दृष्टिकोनातून बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज अधोरेखित केली.

दरम्यान, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांबाबतही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत माहिती दिली.

तंत्रज्ञानाचा वाढता वापर

अॅग्री-स्टॅक आणि 'शेतकरी आयडी'मुळे शेतकऱ्यांची डिजिटल नोंद तयार होणार आहे. यामुळे शासकीय योजनांचा लाभथेट आणि अचूक पद्धतीने देणे शक्य होईल. तसेच रिअल-टाइम माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि इतर इनपुट्स देणे, उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आणि उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करणे, यावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

विभागीय परिषदांद्वारे आणि राज्यांमधील समन्वयातून ज्ञानाची देवाणघेवाण व नवकल्पनांना चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. गोव्याच्या भौगोलिक व कृषी वैशिष्ट्यांना अनुरूप सर्वोत्तम पद्धती स्वीकारण्यास या सहकार्याचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतीचे डिजिटलायझेशन

अॅग्री-स्टॅक अंतर्गत 'शेतकरी आयडी'सारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांसाठी एकात्मिक डिजिटल प्रणाली उभारणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे शासकीय योजनांचा लाभ अधिक अचूकपणे पोहोचवणे, सेवा वितरण सुधारणा आणि शेतकऱ्यांना रिअल-टाइम कृषी साहाय्य मिळणे सुलभहोणार आहे. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते यांसारखे आवश्यक इनपुट्स उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे, यावर सरकारचे लक्ष केंद्रित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत' या ध्येयाशी सुसंगत राहून शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि शेतकरी-केंद्रित कृषी व्यवस्था उभारण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी अधोरेखित केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Strengthening Agriculture for Developed India: CM Pramod Sawant's Focus

Web Summary : Goa focuses on tech-driven agriculture for a developed India. CM Sawant highlighted initiatives like Agri-Stack and Farmer ID for digital registration, benefiting farmers with direct access to schemes and market support. The government aims to boost farmer income and ensure timely access to resources.
टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAgriculture Sectorशेती क्षेत्र