शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

गोव्यातील काँग्रेसमधील सोनियानिष्ठांचे दिवस मागे पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 10:54 IST

गोव्यातील काँग्रेसमधील सोनिया गांधी निष्ठांचे म्हणजेच ओल्ड गार्डचे दिवस आता मागे पडले आहेत असे स्पष्ट संकेत गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीमुळे प्राप्त होत आहेत.

पणजी : गोव्यातील काँग्रेसमधील सोनिया गांधी निष्ठांचे म्हणजेच ओल्ड गार्डचे दिवस आता मागे पडले आहेत असे स्पष्ट संकेत गिरीश चोडणकर यांच्या नियुक्तीमुळे प्राप्त होत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ आमदारांचा जरी चोडणकर यांना आक्षेप होता, तरी देखील चोडणकर यांची नियुक्ती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी करून काँग्रेसमधील ज्येष्ठांना योग्य तो संदेश दिला आहे. 

प्रतापसिंग राणे, शांताराम नाईक, रवी नाईक, सुभाष चोडणकर, फ्रान्सिस सार्दिन, लुईडिन फालेरो, दिगंबर कामत आदी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेते हे जुन्या पठडीतील मानले जातात. राणे हे गिरीश चोडणकर यांच्यासाठी अनुकूल नव्हते. कामत हेही अनुकूल नव्हते आणि रवी नाईक हे डबल गेम खेळत होते. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनाही स्वत:ला अध्यक्ष बनण्याची इच्छा होती. या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी चोडणकर यांचीच नियुक्ती केल्यास गोव्यातील लोकांमध्ये योग्य तो संदेश जाईल हे राहुल गांधी यांना पटवून देण्यात काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे यशस्वी ठरले. जर काँग्रेसमधील एखाद्या जुन्या नेत्याकडेच प्रदेशाध्यक्षपद सोपविले गेले असते तर काँग्रेस पक्ष नव्या रक्ताला वावच देत नाही, असा संदेश काँग्रेसच्या युवा कार्यकत्र्यामध्ये गेला असता. 

काँग्रेसच्या गोव्यातील नेत्यांमध्ये सोनिया गांधी यांच्याशी निष्ठा असणारे अनेकजण आहेत. मात्र काँग्रेसमध्ये आता नवा अध्याय सुरू झाला आहे. राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सुत्रे आल्याने गोव्यातही काँग्रेसचे नेतृत्व तरुण नेत्याकडे सोपविणो गरजेचेच होते. ती गरज राहुल गांधी यांनी पूर्ण केली आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजपमधील नेत्यांशी कायम चांगले संबंध ठेवले. रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध संघर्ष करणो अशा नेत्यांनी टाळले. मात्र ते दिवस आता मागे पडतील.

आमदारांना भेटणार चोडणकरदरम्यान, चोडणकर यांनी लोकमतला सांगितले, की आपण प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यापूर्वी काँग्रेसच्या सर्व आमदारांना अगोदर भेटेन. त्यांना भेटल्याशिवाय आपण पद स्वीकारणार नाही. गोव्यातील सरकार पाडणो हे आमचे प्राधान्य नाही. मात्र लोकांनी कौल काँग्रेसला दिला होता. सरकार पाडण्याएवढे संख्याबळ काँग्रेसकडे नाही. सध्याच्या आघाडी सरकारमधील घटकच हे सरकार पाडतील तेव्हा काँग्रेस पक्ष काय ती भूमिका पार पाडेल. काँग्रेसमध्ये युवकांना आपण वाव देईन. शिवाय जे काँग्रेस पक्षापासून दूर राहिले त्यांनाही जवळ आणीन. लोकांचे जे शत्रू ते काँग्रेसचे म्हणजेच आमचे शत्रू असतील. गोमंतकीयांना जे हवे आहे, तेच आम्हाला हवे आहे. गोव्याच्या हिताविरुद्ध जे कुणी असतील, त्यांच्याविरोधात आम्ही संघर्ष करू. लोकांच्या अपेक्षांची पुर्ती करणो हे काँग्रेसचे ध्येय असेल. लोकांच्या अपेक्षांपासून पक्ष दूर जाणार नाही.