शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दक्षिण गोव्यात रेल्वे मार्ग रुंदीकरणाला मोठा विरोध, कोळशाचे प्रदूषण होण्याची भिती व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:11 IST

Goa News: रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लॅव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी

मडगाव: गोव्यातून कर्नाटकात कोळशाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी रेल्वे मार्ग दुपदरीकरण  आणि सागरमाला हे प्रकल्प केंद्र सरकार राज्यात कोणत्याही परिस्थितीत पुढे रेटू पाहत असून दक्षिण गोव्यातून या दोन्ही प्रकल्पना विरोध वाढू लागला आहे. यासंदर्भात 'गोयांत कोळसो नाका' या झेंड्याखाली सुरू केलेले आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या रुंदीकरण प्रकल्पाचाच एक भाग म्हणून दक्षिण गोव्यात तीन ठिकाणी रेल्वे फाटके बंद ठेवून काम हाती घेण्याची परवानगी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली होती. ही परवानगी मागे घ्यावी अशी मागणी शुक्रवारी आंदोलकांनी त्यांची भेट घेऊन केली. यापूर्वी या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही परवानगी मागे न घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघण्याची शक्यता असेल असा इशाराही दिला होता. या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. दक्षिण गोव्यातील 24 ग्राम पंचायतींनी या विस्ताराला विरोध केला आहे. या आंदोलनाचा एकूण रागरंग पाहता गोव्यात यापुढे हे कोळसा विरोधी आंदोलन भडकणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लॅव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहुन केली आहे. 

आज गोव्यात पर्यावरणास धोका निर्माण करणाऱ्या रेल्वे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व वीज वाहिनी टाकण्याचा प्रकल्प यांना जनतेचा तिव्र विरोध आहे. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या प्रयत्न सरकारने चालविला असुन, लोक आता रस्त्यावर येवुन त्याला विरोध करीत आहेत असे दिगंबर कामत यांनी आपल्या पत्रातुन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिले आहे. 

२८ ॲाक्टोबर रोजी नेसाय येथे लोकांनी सावथ व्हेस्टर्न रेल्वे व रेल्वे विकास निगमच्या रेल्वे दुपदरीकरण कामास विरोध करीत मध्यरात्री निदर्शने केली असे सांगुन, यापुढे २ नोव्हेंबर रोजी गिरदोली चांदर येथे तसेच ९ नोव्हेंबर रोजी दवर्ली येथे सदर काम होत असताना लोक निदर्शने करणार असल्याचे सांगुन, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. 

जिल्हाधीकाऱ्यानी लोकभावनांचा आदर करुन रेल्वेला दिलेली परवानगी ताबडतोब मागे घ्यावी दुपदरीकरणा सबंधीची सर्व कामे बंद करण्याचे आदेश द्यावेत असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :goaगोवाrailwayरेल्वे