शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

दक्षिण गोव्यात रेल्वे मार्ग रुंदीकरणाला मोठा विरोध, कोळशाचे प्रदूषण होण्याची भिती व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:11 IST

Goa News: रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लॅव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी

मडगाव: गोव्यातून कर्नाटकात कोळशाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी रेल्वे मार्ग दुपदरीकरण  आणि सागरमाला हे प्रकल्प केंद्र सरकार राज्यात कोणत्याही परिस्थितीत पुढे रेटू पाहत असून दक्षिण गोव्यातून या दोन्ही प्रकल्पना विरोध वाढू लागला आहे. यासंदर्भात 'गोयांत कोळसो नाका' या झेंड्याखाली सुरू केलेले आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या रुंदीकरण प्रकल्पाचाच एक भाग म्हणून दक्षिण गोव्यात तीन ठिकाणी रेल्वे फाटके बंद ठेवून काम हाती घेण्याची परवानगी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली होती. ही परवानगी मागे घ्यावी अशी मागणी शुक्रवारी आंदोलकांनी त्यांची भेट घेऊन केली. यापूर्वी या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ही परवानगी मागे न घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघण्याची शक्यता असेल असा इशाराही दिला होता. या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. दक्षिण गोव्यातील 24 ग्राम पंचायतींनी या विस्ताराला विरोध केला आहे. या आंदोलनाचा एकूण रागरंग पाहता गोव्यात यापुढे हे कोळसा विरोधी आंदोलन भडकणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी सासष्टीतील रेल्वे लॅव्हल क्राॅसिंग बंद करण्याची दिलेली परवानगी त्वरीत मागे घ्या व दुपदरीकरणाची सर्व कामे थांबवा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहुन केली आहे. 

आज गोव्यात पर्यावरणास धोका निर्माण करणाऱ्या रेल्वे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व वीज वाहिनी टाकण्याचा प्रकल्प यांना जनतेचा तिव्र विरोध आहे. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याच्या प्रयत्न सरकारने चालविला असुन, लोक आता रस्त्यावर येवुन त्याला विरोध करीत आहेत असे दिगंबर कामत यांनी आपल्या पत्रातुन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिले आहे. 

२८ ॲाक्टोबर रोजी नेसाय येथे लोकांनी सावथ व्हेस्टर्न रेल्वे व रेल्वे विकास निगमच्या रेल्वे दुपदरीकरण कामास विरोध करीत मध्यरात्री निदर्शने केली असे सांगुन, यापुढे २ नोव्हेंबर रोजी गिरदोली चांदर येथे तसेच ९ नोव्हेंबर रोजी दवर्ली येथे सदर काम होत असताना लोक निदर्शने करणार असल्याचे सांगुन, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. 

जिल्हाधीकाऱ्यानी लोकभावनांचा आदर करुन रेल्वेला दिलेली परवानगी ताबडतोब मागे घ्यावी दुपदरीकरणा सबंधीची सर्व कामे बंद करण्याचे आदेश द्यावेत असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :goaगोवाrailwayरेल्वे