शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

१९ डिसेंबरपर्यंत सर्व वननिवासींचे जमीनहक्क दावे निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:33 IST

उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वननिवासींना जमिनींचे हक्क बहाल करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. आतापर्यंत ८७१ दावे निकालात काढले असून सनदा बहाल केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले की, १० हजार ५०० अर्ज आले होते. पैकी ८७१ निकालात काढले. वनक्षेत्रात जमीन येत नसल्याने ९४९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अन्य अर्जावर प्रक्रिया चालू आहे. १४ जून रोजी तब्बल दहा हजार प्रलंबित दाव्यांबाबत विशेष शिबिर घेतले जाईल. २१ जून रोजी सनदांशी संबंधित ग्रामसभा होतील. येत्या १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणे निकालात काढली जातील. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दोन्ही जिल्हाधिकारी तसेच या प्रकरणी नोडल अधिकारी म्हणून नेमलेले अजय गावडे व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. गोव्यात खास करून गावडा, कुणबी, वेळीप आधी अनुसूचित जमातींचे लोक वनक्षेत्रात निवास करून जमिनी कसतात, त्यांना जमिनीचे हक्क मिळायला हवेत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात वनांमध्ये निवास करणारे अनेकजण तिथे जमिनीही कसतात. तिथे त्यांची वस्ती आहे. निवासीहक्क कायद्यानुसार त्यांना जमिनींच्या सनदा मिळणे क्रमप्राप्त आहे. परंतु गेली अनेक वर्षे हे दावे पडून आहेत. स्पॉट व्हेरिफिकेशन अर्थात जागेची पडताळणी, ग्रामसभांमध्ये मंजुरी, त्यानंतर उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील दावे मंजूर झाल्यानंतर सनदा दिल्या जातात.

१४ जून रोजी ६ तालुक्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करून प्रलंबित वनहक्क प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल. १०,५०० अर्जापैकी ८७१ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत आणि ९४९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. २१ जून रोजी सनदांशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली जाईल. १५० सनदा वाटपासाठी तयार आहेत. १४ जून रोजी तब्बल दहा हजार प्रलंबित दाव्यांबाबत विशेष शिबिर घेतले जाईल. तर येत्या १९ डिसेंबरपर्यंत सर्व प्रकरणे निकालात काढली जातील.

वनहक्क प्रतिनिधींचे सहकार्य मिळायला हवे

अनेकदा वनहक्क प्रतिनिधी बैठकांना उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे दावे रेंगाळतात. प्रत्येक गावात अशा समित्या स्थापन केलेल्या आहेत. त्यावरील सदस्यांनी सहकार्य करायला हवे. तसेच ग्रामसभांमध्ये आवश्यक ती गणपूर्ती व्हायला हवी. त्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करायला हवे, असे सरकारचे म्हणणे आहे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकार