शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'लाला की बस्ती' जमीनदोस्त होणार! उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 08:41 IST

या बस्तीवर बुलडोझर फिरविला जाणार हे निश्चित झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: थिवी येथील कोमुनीदाद जमिनीत उभारण्यात आलेली 'लाला की बस्ती पाडण्याच्या आदेशाविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे आता या बस्तीवर बुलडोझर फिरविला जाणार हे निश्चित झाले आहे.

ही बस्ती पाडण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. त्या आदेशाला प्रशासकीय लवादाकडे आव्हान दिले होते. प्रशासकीय लवादाने आव्हान अर्ज फेटाळल्यानंतर याचिकादार अयुब खान व इतरांनी उत्तर गोवा सत्र न्यायालयात धाव घेतली होती; परंतु सत्र न्यायालयाने या प्रकरणात सविस्तर सुनावणी घेऊन १५-१२-२०१९ रोजी निवाडा जारी करताना आव्हान याचिका फेटाळली होती. त्यामुळे याचिकादाराने खंडपीठात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पूर्ण होऊन २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निवाडा राखून ठेवला होता. हा निवाडा बुधवारी जाहीर करण्यात आला. आव्हान याचिका फेटाळताना न्यायालयाने उभय बाजूने केलेल्या युक्तिवादांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

जिल्हा प्रशासना दिलेला आदेश हा नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचा याचिकादाराचा युक्तिवाद खंडपीठाने खोडून काढताना याचिकादाराला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या जमिनीवरील बांधकामे कायदेशीर करण्याची प्रक्रिया सुरु असताना ती पाडण्याचा आदेश दिल्याचा युक्तिवाद हा या ठिकाणी तर्कसंगत नसल्याचे म्हटले आहे. कारण अशा प्रकारची बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ही केवळ दि. १५ -६-२००० पूर्वीच्या बांधकामासाठी लागू होत आहेत आणि ही वस्ती त्या नंतरची असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.

वादग्रस्त बस्ती...

लाला की बस्तीमध्ये मध्यंतरी कोलवाळ पोलिसांनी पडताळणी केली असता या ठिकाणी राहणाऱ्या ६० भाडेकरूंनी आपली माहिती पोलिसांना दिली नसल्याचे आढळून आले होते. हा मुद्दा गोवा विधानसभेतही गाजला होता. रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर यांनी या वस्तीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरीतांकडे मतदार ओळखपत्रे कशी आली, असा प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यभरातील प्रत्येक मतदारसंघात गोवेकरांच्या हक्काच्या कोमुनिदाद जागेवर परप्रांतीयांनी बेकायदा झोपडपट्ट्या उभारल्या आहेत. शेती करण्याच्या नावाखाली जमीन घेऊन नंतर ती बेकायदेशीरपणे विकून झोपडपट्टी उभारली. मात्र, या बेकायदेशीरपणाला न्यायालयाने चाप लावला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. - मनोज परब, आरजी नेते. 

टॅग्स :goaगोवाHigh Courtउच्च न्यायालय