शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

भाजपच्या विरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव; फोंड्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2023 15:23 IST

सध्या या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वाधिक सक्रिय आहे.

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भाजपने सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जात आहेत. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या फोंडा तालुक्यात तालुक्यातील तीन व लगतच्या सावर्डे विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. सध्याची राजकीय समीकरणे पाहता, विरोधक पूर्णपणे विखुरलेले आहेत. येथे पूर्वी भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस व मगो पक्ष सक्रिय असायचा. परंतु आज काँग्रेसची स्थिती कमकुवत आहे तर मगो पक्ष भाजप सरकारमध्ये सत्तेत आहे. सध्या या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वाधिक सक्रिय आहे.

गतवेळीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे रवी नाईक यांच्यासारखा मातब्बर नेता होता. मगोची मते सुद्धा काँग्रेस उमेदवाराकडे वळल्याने काँग्रेसचे काम सोपे झाले होते. परंतु आता समीकरणे बदललेली आहेत. चारही मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या अधिक आहे. फक्त फोंडा मतदारसंघात मुस्लिम व खिश्चन मतदारांची संख्या जास्त आहे. परंतु या दोन्ही समाजातील अधिकतर मतदारांवर रवी नाईक व केतन भाटीकर यांचा प्रभाव आहे. त्यातील ५० टक्के मते तरी भाजपकडे वळली जातील.

भंडारी समाजातील मोठे नेते व भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव नाईक यांची भूमिका लोकसभेत महत्त्वाची राहणार आहे. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवताना त्यांनी सहा हजार शंभर मते घेतली होती. आरजी पक्षाने त्यांच्या मताला सुरुंग लावला नसता तर मागच्या वेळी ते निवडून सुद्धा आले असते. शिरोडा मतदारसंघात आम आदमीचे फारसे अस्तित्व नव्हते आणि आताही नाही. त्याचा अर्थ महादेव नाईक यांना मिळालेली सहा हजार मते ही त्यांची स्वतःची होती. त्यांनी भाजपला साथ दिल्यास भाजपला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते.

विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला येथे अजूनही संघटन बांधता आलेले नाही. गत विधानसभा निवडणुकीत मडकई मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार लवू मामलेदार यांनी पराभवानंतर पक्षाला वाऱ्यावर सोडले आहे. तीच स्थिती शिरोडा मतदारसंघाची होती. तेथील काँग्रेसचे उमेदवार आज कुठेच दिसत नाहीत. सावर्डे मतदारसंघात खेमलो सावंत यांनी जेमतेम ३६० मते मिळवली, परंतु नंतर त्यांनी मतदारसंघात पाय सुद्धा ठेवलेला नाही. थोडक्यात तीनही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाकडे लक्ष दिलेले नाही. आता संघटन बांधायला त्यांच्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. त्यामुळेच भाजपला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी होते की काय, अशी चर्चा येथील मतदारांमध्ये आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण