शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

भाजपच्या विरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव; फोंड्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2023 15:23 IST

सध्या या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वाधिक सक्रिय आहे.

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : भाजपने सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जात आहेत. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या फोंडा तालुक्यात तालुक्यातील तीन व लगतच्या सावर्डे विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. सध्याची राजकीय समीकरणे पाहता, विरोधक पूर्णपणे विखुरलेले आहेत. येथे पूर्वी भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस व मगो पक्ष सक्रिय असायचा. परंतु आज काँग्रेसची स्थिती कमकुवत आहे तर मगो पक्ष भाजप सरकारमध्ये सत्तेत आहे. सध्या या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सर्वाधिक सक्रिय आहे.

गतवेळीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे रवी नाईक यांच्यासारखा मातब्बर नेता होता. मगोची मते सुद्धा काँग्रेस उमेदवाराकडे वळल्याने काँग्रेसचे काम सोपे झाले होते. परंतु आता समीकरणे बदललेली आहेत. चारही मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या अधिक आहे. फक्त फोंडा मतदारसंघात मुस्लिम व खिश्चन मतदारांची संख्या जास्त आहे. परंतु या दोन्ही समाजातील अधिकतर मतदारांवर रवी नाईक व केतन भाटीकर यांचा प्रभाव आहे. त्यातील ५० टक्के मते तरी भाजपकडे वळली जातील.

भंडारी समाजातील मोठे नेते व भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेले महादेव नाईक यांची भूमिका लोकसभेत महत्त्वाची राहणार आहे. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवताना त्यांनी सहा हजार शंभर मते घेतली होती. आरजी पक्षाने त्यांच्या मताला सुरुंग लावला नसता तर मागच्या वेळी ते निवडून सुद्धा आले असते. शिरोडा मतदारसंघात आम आदमीचे फारसे अस्तित्व नव्हते आणि आताही नाही. त्याचा अर्थ महादेव नाईक यांना मिळालेली सहा हजार मते ही त्यांची स्वतःची होती. त्यांनी भाजपला साथ दिल्यास भाजपला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते.

विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला येथे अजूनही संघटन बांधता आलेले नाही. गत विधानसभा निवडणुकीत मडकई मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार लवू मामलेदार यांनी पराभवानंतर पक्षाला वाऱ्यावर सोडले आहे. तीच स्थिती शिरोडा मतदारसंघाची होती. तेथील काँग्रेसचे उमेदवार आज कुठेच दिसत नाहीत. सावर्डे मतदारसंघात खेमलो सावंत यांनी जेमतेम ३६० मते मिळवली, परंतु नंतर त्यांनी मतदारसंघात पाय सुद्धा ठेवलेला नाही. थोडक्यात तीनही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाकडे लक्ष दिलेले नाही. आता संघटन बांधायला त्यांच्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. त्यामुळेच भाजपला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी होते की काय, अशी चर्चा येथील मतदारांमध्ये आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण