शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किसान क्रेडिट कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांचा हक्क: मुख्यमंत्री, पणजी येथे राज्य पतपुरवठा चर्चासत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 09:14 IST

शहरात आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्राच्या उ‌द्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रत्येक शेतकऱ्याने किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा. किसान क्रेडिट कार्ड हा शेतकऱ्यांचा कायदेशीर अधिकार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) तर्फे मंगळवारी शहरात आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्राच्या उ‌द्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाने तयार केलेल्या स्टेट फोकस पेपर २०२४-२५चे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात भाताच्या उत्पादनात वाढ झाली असून, राज्यात तांदळाची प्रक्रिया करून निर्यात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नाबार्ड बँकेच्या कार्याची प्रशंसा करून नाबार्ड बँकेचा खासकरून राज्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक सुविधा निर्माण करण्यासाठी सतत हातभार लागला. कृषी आणि इतर उपक्रमांमध्ये कौशल्य वाढविण्यासाठी नाबार्डचे मौल्यवान योगदान आहे. नाबार्डने कृषिक्षेत्राच्या विकासासाठी फक्त आर्थिकच नव्हे, तर ज्ञानसंस्था म्हणूनही योगदान दिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कांदवेलू यांनी नाबार्ड बँकेने राज्यातील महिला बचतगटांना कर्ज सुविधा उपलब्ध केल्यामुळे बँकेची प्रशंसा केली. नाबार्डच्या गोवा कार्यालयाचे महाव्यवस्थापक डॉ. मिलिंद भिरुड यांनी स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिचोली प्रोग्रेसिव्ह शेतकरी उत्पादक संस्थेचे विश्वंभर गावस, पेडणे तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे उदय प्रभुदेसाई, बार्देश तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे सुदेश मयेकर, तिसवाडी तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे प्रेमानंद म्हांबरे आणि सत्तरी तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे आत्माराम शेट्ये यांचा सत्कार केला.

 

टॅग्स :goaगोवा