शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

कुडतरीतील अपहृत विद्यार्थिनी आसाममध्ये

By admin | Updated: September 9, 2015 02:13 IST

मडगाव : एका आठवड्यापूर्वी लोटली येथून अपहरण करण्यात आलेली ११ वर्षीय शालेय विद्यार्थिनी आसाम राज्यात सापडली. या

मडगाव : एका आठवड्यापूर्वी लोटली येथून अपहरण करण्यात आलेली ११ वर्षीय शालेय विद्यार्थिनी आसाम राज्यात सापडली. या विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या तिघा सुरक्षा रक्षकांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. अपहृत मुलगी आणि आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मायणा-कुडतरी पोलिसांचे दहा जणांचे पथक सध्या आसामला रवाना झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अक्षय पालयेकर व साहाय्यक उपनिरीक्षक रोहिदास वेळीप यांच्यासह अन्य आठ पोलीस या मोहिमेवर गेले असून येत्या दोन दिवसांत ते आरोपींना घेऊन गोव्यात येतील. गोव्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यासाठी आलेल्या या तीन संशयितांनी या विद्यार्थिनीचे अपहरण केल्याचा आरोप आहे. शाळेच्या कार्यक्रमाला जाते असे सांगून सकाळी बाहेर पडलेली ही मुलगी सायंकाळी परत न आल्यामुळे दुसऱ्या दिवशी तिच्या पालकांनी मायणा-कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार केली होती. दरम्यान, जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत दक्षिण गोव्यात एकूण २९ अपहरणाच्या घटना घडल्या असून त्यापैकी २५ घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. यातील गंभीर अशी गोष्ट म्हणजे अपहरण करण्यात आलेल्या २९ घटनांपैकी ११ घटनांत अल्पवयीन शालेय विद्यार्थिनींचा समावेश आहे. वास्को पोलीस स्थानकात सर्वात अधिक म्हणजे ७ अपहरणाचे गुन्हे नोंद आहेत. मडगाव पोलीस ठाण्यात पाच, वेर्णा पोलीस ठाण्यात चार, मायणा-कुडतरी, कोलवा व फोंडा येथे प्रत्येकी तीन, केपे पोलीस स्थानकात दोन, तर कुडचडे पोलीस स्थानकात एका घटनेची नोंद झालेली आहे. (प्रतिनिधी)