शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

म्हादाई प्रकल्पाविरोधात खानापूरकरांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:19 IST

खानापूरला संकटात लोटणारा म्हादाई प्रकल्प मागे घेण्याची मागणी.

लोकमत न्यूज नेटवर्क, बेळगाव: म्हादाई वळणाच्या (ड्रायव्हर्जन) प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटाच्या नियुक्त पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात जंगलतोड आणि विखंडन करून अपरिवर्तनीय नुकसान होणार आहे. याखेरीज संपूर्ण खानापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या खेरीज अन्य इतर कारणास्तव म्हादाई वळण प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींसह खानापूर तालुक्यातील समस्त जनतेने संपूर्ण विरोध दर्शवला असून हा प्रकल्प तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज बुधवारी उपजिल्हाधिकारी बेळगाव आणि खानापूर तहसीलदारांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.

म्हादाई नदी कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील म्हादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी, धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास खानापूर तालुक्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्यामुळे म्हादाई प्रकल्पाच्या विरोधात 'खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकऱ्यांना वाचवा' या शीर्षकाखाली आज बुधवारी खानापूर बस स्थानकाजवळील वागळे कॉलेज सभागृहात पर्यावरण प्रेमी आणि तालुक्यातील जनतेची बैठक पार पडली. कर्नाटक सरकार खानापूर तालुक्यातील म्हादाई नदीचे पाणी वळवून ते हुबळी, धारवाड परिसरात नेण्याच्या तयारीत असल्यामुळे या नदीचे भवितव्य धोक्यात आले आहे.

म्हादाई नदीच्या खोऱ्यावर सुमारे ७०० चौ.कि.मी. जंगल अवलंबून आहे. हे जंगल खानापूर परिसरात मुबलक पाऊस पाडण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळेच खानापूरला दक्षिण चेरापुंजी म्हणून ओळख मिळाली आहे. खानापूर तालुक्याचे भवितव्य याच पावसावर आणि नद्यांवर अवलंबून आहे. जर म्हादाई नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखून तिचे पाणी दुसरीकडे वळवल्यास खानापूर तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

यावेळी म्हादाई प्रकल्पामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती चित्रफित आणि व्हिडिओच्या माध्यमातून सादर करण्यात आली. तसेच सदर प्रकल्प विरुद्धची ही लढाई केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हे तर संपूर्ण परिसराच्या पर्यावरणाची, पावसाची, हवामानाची आणि भवितव्याची लढाई असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी बेळगाव आणि खानापूर तहसीलदारांना म्हादाई वळण प्रकल्पा विरोधात निवेदन सादर करून सदर प्रकल्प तात्काळ मागे येण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

आजच्या बैठकीस दिलीप कामत, शिवाजी कागणीकर, सुजित मुळगुंद, कॅ. नितीन धोंड, अॅड. एन. आर. लातूर, जगदीश होसमणी, मल्लिकार्जुन माळी, सिद्धगौडा मोदगी, श्रीमती शारदा गोपाळ, गीता साहू, काशिनाथ नाईक, शंकरांना लंगटी, बसनगौडा पाटील, विल्सन कार्वालो आदींसह बहुसंख्य पर्यावरणप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाKarnatakकर्नाटक