शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

केपे विधानसभा मतदारसंघ भाजपचाच; विरोधकांकडून आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:16 IST

एल्टनना भाजपमध्ये बोलावलेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : केपे मतदारसंघातील भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणतीही कसर न राहता केप्यात पुन्हा भाजपचेच कमळ फुलणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आपल्याला भाजपमध्ये बोलवत असतात, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांना आपण बोलावले नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच भाजपला त्यांना बोलावण्याची गरजही नसल्याचेही ते म्हणाले.

केपे भाजप मंडळाच्या फातर्पा येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटेश्वर संस्थान सभागृहात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, भाजपचे राज्य सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा अध्यक्ष प्रभाकर गावकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप, उपाध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप व शाणू वेळीप, फातर्पाच्या सरपंच मनिषा देसाई, बार्सेचे सरपंच मोहन गावकर, खोलाच्या सरपंच प्रियांका वेळीप उपस्थित होत्या.

केपे मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये. केपे मतदारसंघात होत असलेली विकासकामे ही माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी आपल्या कारकीर्दीत नियोजन व मंजूर करून घेतली होती. कोविड काळात ही कामे प्रलंबित राहिली होती, आता त्या कामांचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी वित्तमंत्री व मुख्यमंत्री म्हणून आपण सहकार्य करत आहोत. त्यामुळे या कामांचे श्रेय आपणास व कवळेकर यांना मिळायला हवे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ओएनजीसीच्या संकुलात बांधलेल्या पंचायत घराचे श्रेय हे राज्य सरकार व केंद्र सरकारला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंडळ अध्यक्ष कृपेश वेळीप यांनी स्वागत तर सरचिटणीस दयेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस अर्जुन वेळीप यांनी आभार मानले.

गोव्यात दिसणारा विकास हा भाजपच्या डबल इंजिनमुळेच झालेला आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले. यापूर्वी २००४ ते २०१२ पर्यंत काँग्रेसच्या डबल इंजिनचे सरकार होते. पण, या काळात गोव्यात कोणताही विकास झाला नाही. भाजप सरकारने जनतेला आधार मिळेल अशा योजना लागू केल्या व या योजनांचा जनतेला मोठा लाभ मिळाला, असे नाईक म्हणाले. केपे मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांचे प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले होते. विद्यमान आमदारांनी त्याचे श्रेय घेण्याचे काम केले, असे कवळेकर म्हणाले.

'३८ हजार कोटी कर्जाचेही श्रेय घ्या'

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या विकासकामांवरील श्रेय लाटण्याच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ३८ हजार कोटी कर्जाचेही श्रेय घ्यावे, अशी टीका केली. राज्यभरातील विकासकामे ही जनतेच्या पैशातून होत असून या विकासाचे श्रेय हे लोकांचे आहे, असेही यांनी सांगितले. चांदर येथे एका कार्यक्रमदरम्यान आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या श्रेय लाटण्याच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले. आलेमाव म्हणाले, की राज्यात होणारा विकास हा प्रत्येक मतदारसंघातील आमदारामुळे होत असतो. याचे कारण म्हणजे आमदार आपल्या मतदारसंघातील विविध कामे आणि त्याच्याशी निगडित ठराव हे सरकार दरबारी पोहोचवत असतो. मुख्यमंत्र्यांनी जे श्रेय लाटण्याची भाष्य केले आहे, ते श्रेय खरे तर जनतेचे आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत