शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

केपे विधानसभा मतदारसंघ भाजपचाच; विरोधकांकडून आमच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:16 IST

एल्टनना भाजपमध्ये बोलावलेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : केपे मतदारसंघातील भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणतीही कसर न राहता केप्यात पुन्हा भाजपचेच कमळ फुलणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आपल्याला भाजपमध्ये बोलवत असतात, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांना आपण बोलावले नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच भाजपला त्यांना बोलावण्याची गरजही नसल्याचेही ते म्हणाले.

केपे भाजप मंडळाच्या फातर्पा येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटेश्वर संस्थान सभागृहात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, भाजपचे राज्य सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा अध्यक्ष प्रभाकर गावकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप, उपाध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप व शाणू वेळीप, फातर्पाच्या सरपंच मनिषा देसाई, बार्सेचे सरपंच मोहन गावकर, खोलाच्या सरपंच प्रियांका वेळीप उपस्थित होत्या.

केपे मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये. केपे मतदारसंघात होत असलेली विकासकामे ही माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी आपल्या कारकीर्दीत नियोजन व मंजूर करून घेतली होती. कोविड काळात ही कामे प्रलंबित राहिली होती, आता त्या कामांचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी वित्तमंत्री व मुख्यमंत्री म्हणून आपण सहकार्य करत आहोत. त्यामुळे या कामांचे श्रेय आपणास व कवळेकर यांना मिळायला हवे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ओएनजीसीच्या संकुलात बांधलेल्या पंचायत घराचे श्रेय हे राज्य सरकार व केंद्र सरकारला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंडळ अध्यक्ष कृपेश वेळीप यांनी स्वागत तर सरचिटणीस दयेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस अर्जुन वेळीप यांनी आभार मानले.

गोव्यात दिसणारा विकास हा भाजपच्या डबल इंजिनमुळेच झालेला आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले. यापूर्वी २००४ ते २०१२ पर्यंत काँग्रेसच्या डबल इंजिनचे सरकार होते. पण, या काळात गोव्यात कोणताही विकास झाला नाही. भाजप सरकारने जनतेला आधार मिळेल अशा योजना लागू केल्या व या योजनांचा जनतेला मोठा लाभ मिळाला, असे नाईक म्हणाले. केपे मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांचे प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले होते. विद्यमान आमदारांनी त्याचे श्रेय घेण्याचे काम केले, असे कवळेकर म्हणाले.

'३८ हजार कोटी कर्जाचेही श्रेय घ्या'

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या विकासकामांवरील श्रेय लाटण्याच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ३८ हजार कोटी कर्जाचेही श्रेय घ्यावे, अशी टीका केली. राज्यभरातील विकासकामे ही जनतेच्या पैशातून होत असून या विकासाचे श्रेय हे लोकांचे आहे, असेही यांनी सांगितले. चांदर येथे एका कार्यक्रमदरम्यान आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या श्रेय लाटण्याच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले. आलेमाव म्हणाले, की राज्यात होणारा विकास हा प्रत्येक मतदारसंघातील आमदारामुळे होत असतो. याचे कारण म्हणजे आमदार आपल्या मतदारसंघातील विविध कामे आणि त्याच्याशी निगडित ठराव हे सरकार दरबारी पोहोचवत असतो. मुख्यमंत्र्यांनी जे श्रेय लाटण्याची भाष्य केले आहे, ते श्रेय खरे तर जनतेचे आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत