शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

दिगंबर कामतांचा पराभव अन् काँग्रेस उमेदवाराचा विजय हेच ध्येय ठेवा: माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:05 IST

पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात यापुढे प्रवेश देणार नाही, असा निर्णय राहुल गांधी यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : येथील विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. मडगाव मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचा पराभव करून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्क्यांनी विजय मिळवून देणे हेच ध्येय ठेवा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

मडगावमध्ये रविवारी संध्याकाळी ठाकरे यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते आणि काँग्रेस समर्थकांची बैठक घेतली. यावेळी काँग्रेस पक्ष्याचे नेते सावियो डिसिल्वा, सावियो कुतिन्हो, राजन घाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचा व सर्वांनी मिळून काम करण्याचा कानमंत्र ठाकरे यांनी दिला.

काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये गेले आहेत. तरीही निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मडगावमध्ये काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला आहे. काँग्रेसच्या उन्नतीसाठी आपल्याला पुढे जाण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. कामत यांच्यासह सर्व पक्षांतर केलेल्यांना पराभूत करून त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी करण्याचे लक्ष्य ठेवा, असेही ते म्हणाले.

जनतेला विश्वासात घेऊनच उमेदवार जाहीर करू

जनतेला विश्वासात घेऊनच उमेदवार देऊन ठाकरे म्हणाले की, आमदार कामत यांनी मडगावच्या विकासाची कधीच पर्वा केली नाही. पक्षांतर करणाऱ्यांना काँग्रेस पक्षात यापुढे प्रवेश देणार नाही, असा निर्णय राहुल गांधी यांनी निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी जनतेला विश्वासात घेतले जाईल. भाजपच्या राजकारण्यांमध्ये मतभेद आहेत. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. जनसंपर्क वाढवून लोकांमध्ये परत एकदा विश्वास निर्माण केला पाहिजे, असे ठाकरे यांनी सांगितले.

पक्षबदलूंनी केला विश्वासघात : पाटकर

अमित पाटकर म्हणाले की, आठ दल बदलूंनी लोकांचा आणि पक्षाचा विश्वासघात केला. २०२२ मध्ये गोमंतकीयांच्या मोठ्या आशा होत्या, पण पुन्हा एकदा भाजप सत्तेत आला. पक्षांतर करणाऱ्यांनी काँग्रेस पक्षात दुसऱ्या फळीतील नेतृत्व कधीच तयार केले नाही. त्यामुळे आता आम्हाला पक्षाची सुरुवातीपासून बांधणी करावी लागणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाची टक्केवारी कमी केली आहे. २०२७ मध्ये मडगाव मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास पाटकर यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thakareमाणिकराव ठाकरेManikrao Thackreyमाणिकराव ठाकरे