शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

कर्नाटकने म्हादईवरील बांध फोडला; यंत्रसामुग्री हलवली, कणकुंबी येथे खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 13:52 IST

म्हादई नदीच्या प्रवाहावर तथा कळसा-भंडुरा नाल्यावर कणकुंबी येथे कर्नाटकने बांधलेला बांध स्वत:च फोडला आहे. त्यामुळे प्रवाह पूर्ववत वाहू लागला आहे. तेथील यंत्रसामुग्रीही काढून ती अन्यत्र नेण्यात आली आहे, असे म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

पणजी : म्हादई नदीच्या प्रवाहावर तथा कळसा-भंडुरा नाल्यावर कणकुंबी येथे कर्नाटकने बांधलेला बांध स्वत:च फोडला आहे. त्यामुळे प्रवाह पूर्ववत वाहू लागला आहे. तेथील यंत्रसामुग्रीही काढून ती अन्यत्र नेण्यात आली आहे, असे म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी बुधवारी येथे सांगितले.

केरकर यांनी कणकुंबी येथे बुधवारी दुपारी भेट दिली. त्यावेळी कळसा-भंडुरा नाल्यावर कर्नाटकने बांधलेला बांध फोडलेला असल्याचे त्यांना आढळून आले. पूर्वीप्रमाणोच स्थिती निर्माण केली गेली आहे व त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे. गेल्या महिन्यात बांध बांधून हे पाणी अडविले गेले होते, असे केरकर यांचे म्हणणे आहे. कळसा-भंडुरा नाल्याजवळ पूर्वी बरीच यंत्रसामुग्री असायची. ही सामुग्री आता संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कार्यालयाजवळ नेण्यात आली आहे. गोव्यात खळबळ माजल्यानंतर व गोवा सरकारने लवादाकडे अवमान याचिका सादर करण्याची भूमिका यापूर्वी जाहीर केल्यामुळे कर्नाटकने तो बांध फोडून टाकला असावा असे पर्यावरणप्रेमींना वाटते.

गोवा व कर्नाटकमधील म्हादई पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. गोवा सरकारला या वादामुळे टीकेचे धनी व्हावे लागले आहे. कर्नाटकमध्ये गोव्याच्या निषेधार्थ वारंवार बंद पाळले जात आहेत. कर्नाटकला म्हादई नदीचे पाणी देण्यास गोमंतकीयांचा आक्षेप आहे. म्हादई पाणी तंटा लवादासमोर आता अंतिम टप्प्यातील युक्तीवाद सुरू झाले आहेत. अशावेळीच कर्नाटकच्या यंत्रणोने म्हादई नदीच्या प्रवाहावर बांध बांधून पाणी अडविल्याचे वृत्त येऊन गोव्यात धडकले होते. स्वत: केरकर यांनी पाहणी करून बांध बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. गोव्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही याची गंभीरपणो दखल घेतल्यानंतर मंत्री विनोद पालयेकर तसेच गोव्याच्या अभियंत्यांच्या पथकानेही कणकुंबी येथे कळसा-भंडुरा नाल्याला भेट दिली होती. गोव्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी गेल्या पंधरवडय़ात कर्नाटक सरकारला पत्र लिहिले व कर्नाटकने बांध बांधून न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचे नमूद केले होते. त्यावर गेल्या सोमवारी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून आम्ही फक्त बांधकामविषयक कचरा काढला व कोणत्याच न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही असा दावा केला.