शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोव्याहून महाराष्ट्रात जाणारी  कदंबची बससेवा तिसऱ्या दिवशीही बंद, सोलापूरची गाडीही रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 12:12 IST

महाराष्ट्रात एसटी बसगाड्यांचा संप सुरूच राहिल्याने गोव्याहून महाराष्ट्रात जाणारी कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा सलग तिसऱ्या दिवशीही बंद आहे.

पणजी : महाराष्ट्रात एसटी बसगाड्यांचा संप सुरूच राहिल्याने गोव्याहून महाराष्ट्रात जाणारी कदंब वाहतूक महामंडळाची बससेवा सलग तिसऱ्या दिवशीही बंद आहे. तीन दिवस महाराष्ट्रात गोव्याच्या बसेस बंद ठेवण्याची वेळ यापूर्वी कधीच गोव्याच्या कदंब महामंडळावर आली नव्हती. एसटींच्या संपामुळे गोवा कदंब वाहतूक महामंडळ रोज साडेचार लाख रुपयांच्या महसुलाला मुकत आहे. तीन दिवसात 13.5 लाखांचे उत्पन्न बुडाल्याचे महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

गोव्यातील हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहे. खासगी बसगाड्या गोव्याहून महाराष्ट्रात जात असल्या तरी महाराष्ट्रातील अंतर्गत भागांमध्ये या बसगाड्या प्रवासी वाहतूक करत नाहीत. या गाड्या पणजीहून फक्त पुणे व मुंबईला जातात. कदंब वाहतूक महामंडळाची थेट सोलापुरला जाणारी बसगाडीही गुरूवारी बंद ठेवण्यात आली आहे. 

गोव्याहून महाराष्ट्रातील एकूण चौदा मार्गांवर रोज 37 बसगाड्या प्रवासी वाहतूक करतात . यापूर्वी कधीच दिवाळीत गोमंतकीय प्रवाशांची एवढी मोठी गैरसोय झाली नव्हती. यापुढेही एसटींचा संप सुरू राहिला तर पोलिस बंदोबस्तात गोव्याहून कदंबच्या बसगाड्या महाराष्ट्रात पाठवाव्यात असाही विचार महामंडळाच्या व्यवस्थापनाने चालवला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप