शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नोकरीही गेली, भरपाईही नाही!; वेदांताच्या कर्मचाऱ्यांची न्यायासाठी हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 22:34 IST

खाणी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांकडून कुणाला काढले नसल्याचे यापूर्वी सरकारने म्हटले असले, तरी वेदांता कंपनीकडून बार्जवरील १९० कर्मचा-यांना ब्रेक दिल्यामुळे त्यांना घरी बसणे भाग पडले आहे. या कर्मचा-यांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. 

पणजी: खाणी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांकडून कुणाला काढले नसल्याचे यापूर्वी सरकारने म्हटले असले, तरी वेदांता कंपनीकडून बार्जवरील १९० कर्मचा-यांना ब्रेक दिल्यामुळे त्यांना घरी बसणे भाग पडले आहे. या कर्मचा-यांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. वेदांता कंपनीच्या मेसर्स मॅकारोनी शीप मेनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून १९० पेक्षा अधिक कर्मचा-यांना कामावर ब्रेक दिला आहे. या १९० कर्मचा-यात ९० हून अधिक गोमंतकीय आहेत तर इतर केरळ व महाराष्ट्रातील आहेत. हे कर्मचारी पूर्वी मेसर्स आय पी मरीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड खाली कामाला होते. त्यानंतर जुलै २०१७ पासून त्यांना मेसर्स मॅकारोनी शीप मेनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी म्हणून नेमणुका करण्यात आल्या. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी  २०१८ मध्ये या कर्मचा-यांना ब्रेक देण्यात आला. त्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील ५ ते ६ महिने त्यांन रोजगार नाही. तसेच कंपनीकडून त्यांना भरपाईही दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. या कर्मचा-यांशी कंपनीने केलेल्या २०१२ मधील करारानुसार कर्मचा-यांच्या नेमणुका या कंत्राटी नसून कायम तत्वावर असल्याचा कर्मचा-यांचा दावा आहे. तसेच नियमित बोनस व इतर सुविधांत्यांना दिल्या जातील असे करारात आहे असे त्यांनी म्हटले आहे. असे असताना त्यांना अचानक ब्रेक देण्यात येतो आणि कामावरून काढल्याची नोटीसही दिली जात नाही आणि कामावरही बोलावले जात नाही अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. या कर्मचा-यांकडून कंपनीला अनेक पत्रे लिहून त्यांना कामावर घेण्याच्या विनवण्याही केल्या आहेत, परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही त्यांनी दोन पत्रे लिहिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन त्यांचा गेलेला रोजगार मिळवून द्यावा अशी विनंती त्यांना केली  आहे. पहिल्या पत्राला प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्मरणपत्रही पाठविण्यात आले आहे. अद्याप त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.  एक तर त्यांचा गेलेला रोजगार पुन्हा मिळवून द्यावा किंवा त्यांना योग्य भरपाई तरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :goaगोवा