शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:38 IST

गेल्या ५० वर्षांत झाला नाही एवढा विकास दहा वर्षांत भाजपने केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'गोवा मुक्तिलढ्यात जनसंघाच्या नेत्यांचे मोठे योगदान आहे. १९५५ साली जगन्नाथराव जोशी तसेच जनसंघाच्या अन्य नेत्यांनी गोवा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला हे विसरून चालणार नाही,' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. रविवारी भाजप स्थापना दिनानिमित्ताने येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोव्यात ट्रिपल इंजिनने विकासाची घोडदौड चालूच ठेवली आहे. गेल्या पन्नास वर्षांत झाला नाही एवढा विकास दहा वर्षांत झाला. राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय व नंतर आपण अशा विचारधारेने भाजपचे कार्यकर्ते नेते तसेच काम करत आहेत. पुढील शंभर वर्षे भाजप राजकारणात राहावा, यासाठी तळागाळात कार्यकर्ते काम करत आहेत. लवकरच गोव्यातील कार्यकर्त्यासाठी कदंब पठारावर सुसज्ज असे नवीन कार्यालय सुरू होणार आहे.' कार्यक्रमास व्यासपीठावर पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हेही होते. तसेच आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आमदार राजेश फळदेसाई, आमदार जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थिती लावली होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'भाजपने देशात सुराज्य व रामराज्य आणले. राम मंदिर उभे केले. दुसऱ्या पिढीचा नेता म्हणून गोव्यातील जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले. असंख्य कार्यकर्ते व मतदार यांच्या बळावरच आम्ही पुढे जात आहोत.' सावंत म्हणाले की, 'भाजपने अखंड भारताचे स्वप्न पाहिले. जनसंघासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंतचे कार्य, देशात रामराज्य यावे यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. लाखो कार्यकर्त्यांनी रामराज्यासाठी त्याग केला. जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अखंड भारताचे स्वप्न भाजपने पूर्ण केले. 'एक विधान, एक प्रधान, एक निशान' ही संकल्पना सत्यात आणली. जम्मू-काश्मीरमध्ये दोन देशांचे झेंडे लागत होते. ३७० कलम रद्द करून भाजपने 'एक भारत, श्रेष्ठ भारत' अशी अखंडता आणली.'

काँग्रेसकडून तुष्टीकरण : श्रीपाद नाईक

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, 'काँग्रेसने केवळ व्होट बँकेसाठी तुष्टीकरण केले. घटना पायदळी तुटून आणीबाणी लादली, परंतु जनतेने त्यांना धडा शिकवला. काँग्रेसमुळेच देशावर वाईट परिस्थिती ओढवली. भाजपने घटनेशी कधीही छेडछाड केली नाही, तसेच कधी विचारधाराही सोडलेली नाही. लोकसभेत दोन खासदार येथून सुरू झालेला प्रवास बहुमतावर पोहोचला आहे.

दामू यांच्याकडून जुन्या नेत्यांच्या नावांचा उल्लेख

'भाजपच्या वाटचालीत जुन्या नेत्यांचे मोठे योगदान आहे' असे सांगून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नावाचाही आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, '२०४७ मध्ये भारत विश्व गुरू होणार व पहिल्या क्रमांकावर पोचणार हे निश्चित. त्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करूया व पक्षाला जास्तीत जास्त उभारी देऊया.' ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाल्यानंतर पहिले अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयीपासून जे. पी. नड्डांपर्यंतचा प्रवास दामूंनी सांगितला. पक्षाची स्थापना झाल्यानंतर गोव्यातही काशिनाथ परब, दादा आर्लेकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, भालचंद्र बखले, दत्ता भि. नाईक, जी. वाय. भांडारे यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. जनसंघाची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागासमोर मी नतमस्तक होतो.'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण