शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

जयराम रमेश यांचे पत्र बंधनकारक नाही; ॲडव्होकेट जनरल पांगम यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:07 IST

मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकार कोर्टाकडे करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः २०११ साली केंद्रीय पर्यावरणमंत्री असताना जयराम रमेश यांनी राखीत व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याचे निर्देश देणारे लिहिलेले पत्र गोवा सरकारवर बंधनकारक नाही. असे निर्देश द्यायला ते अधिकारिणी नव्हेत, असे स्पष्ट मत अँडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी व्यक्त केले. 

म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासंबंधी केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालय किंवा राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळाने कोणताही ठराव घेतलेला नाही. हायकोर्टाने गेल्या जुलैमध्ये म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती, ती येत्या २४ रोजी संपते. ही मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकार कोर्टाकडे करणार आहे.

पांगम म्हणाले की, सध्या आम्ही हायकोर्ट आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तेथे काय निवाडा येतो यावर सर्वकाही अवलंबून आहे. तूर्त सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसल्याने आम्ही मुदतवाढीसाठी हायकोर्टात जाणार आहोत.

पांगम म्हणाले की, या प्रकरणात हायकोर्टाने अन्य काही निर्देशही दिले होते. अभयारण्यामधील अतिक्रमणे शोधण्याचे निर्देश आहेत. परंतु अशी कोणतीही अतिक्रमणे माझ्या मते नाहीत. राखीव व्याघ्र क्षेत्राची शिफारस राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून यायला हवी, ती आलेली नाही. प्राधिकरणाच्या एखाद्या सदस्याने पत्र लिहिले म्हणजे ती शिफारस नव्हे.

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या पत्राबद्दल विचारले असता, पांगम म्हणाले की, जयराम रमेश म्हणजे अधिकारिणी नव्हे. वन्य प्राणी संवर्धन कायद्याखाली अशा गोष्टींसाठी अधिकारिणी नेमलेली आहे. त्यावर अनेक सदस्य असतात.

 

टॅग्स :goaगोवा