शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जयराम रमेश यांचे पत्र बंधनकारक नाही; ॲडव्होकेट जनरल पांगम यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:07 IST

मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकार कोर्टाकडे करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः २०११ साली केंद्रीय पर्यावरणमंत्री असताना जयराम रमेश यांनी राखीत व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याचे निर्देश देणारे लिहिलेले पत्र गोवा सरकारवर बंधनकारक नाही. असे निर्देश द्यायला ते अधिकारिणी नव्हेत, असे स्पष्ट मत अँडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी व्यक्त केले. 

म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासंबंधी केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालय किंवा राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळाने कोणताही ठराव घेतलेला नाही. हायकोर्टाने गेल्या जुलैमध्ये म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती, ती येत्या २४ रोजी संपते. ही मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकार कोर्टाकडे करणार आहे.

पांगम म्हणाले की, सध्या आम्ही हायकोर्ट आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तेथे काय निवाडा येतो यावर सर्वकाही अवलंबून आहे. तूर्त सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसल्याने आम्ही मुदतवाढीसाठी हायकोर्टात जाणार आहोत.

पांगम म्हणाले की, या प्रकरणात हायकोर्टाने अन्य काही निर्देशही दिले होते. अभयारण्यामधील अतिक्रमणे शोधण्याचे निर्देश आहेत. परंतु अशी कोणतीही अतिक्रमणे माझ्या मते नाहीत. राखीव व्याघ्र क्षेत्राची शिफारस राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून यायला हवी, ती आलेली नाही. प्राधिकरणाच्या एखाद्या सदस्याने पत्र लिहिले म्हणजे ती शिफारस नव्हे.

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या पत्राबद्दल विचारले असता, पांगम म्हणाले की, जयराम रमेश म्हणजे अधिकारिणी नव्हे. वन्य प्राणी संवर्धन कायद्याखाली अशा गोष्टींसाठी अधिकारिणी नेमलेली आहे. त्यावर अनेक सदस्य असतात.

 

टॅग्स :goaगोवा