शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

जयराम रमेश यांचे पत्र बंधनकारक नाही; ॲडव्होकेट जनरल पांगम यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:07 IST

मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकार कोर्टाकडे करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः २०११ साली केंद्रीय पर्यावरणमंत्री असताना जयराम रमेश यांनी राखीत व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्याचे निर्देश देणारे लिहिलेले पत्र गोवा सरकारवर बंधनकारक नाही. असे निर्देश द्यायला ते अधिकारिणी नव्हेत, असे स्पष्ट मत अँडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी व्यक्त केले. 

म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासंबंधी केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालय किंवा राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळाने कोणताही ठराव घेतलेला नाही. हायकोर्टाने गेल्या जुलैमध्ये म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्र अधिसूचित करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती, ती येत्या २४ रोजी संपते. ही मुदत वाढवून देण्याची मागणी राज्य सरकार कोर्टाकडे करणार आहे.

पांगम म्हणाले की, सध्या आम्ही हायकोर्ट आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तेथे काय निवाडा येतो यावर सर्वकाही अवलंबून आहे. तूर्त सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसल्याने आम्ही मुदतवाढीसाठी हायकोर्टात जाणार आहोत.

पांगम म्हणाले की, या प्रकरणात हायकोर्टाने अन्य काही निर्देशही दिले होते. अभयारण्यामधील अतिक्रमणे शोधण्याचे निर्देश आहेत. परंतु अशी कोणतीही अतिक्रमणे माझ्या मते नाहीत. राखीव व्याघ्र क्षेत्राची शिफारस राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून यायला हवी, ती आलेली नाही. प्राधिकरणाच्या एखाद्या सदस्याने पत्र लिहिले म्हणजे ती शिफारस नव्हे.

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या पत्राबद्दल विचारले असता, पांगम म्हणाले की, जयराम रमेश म्हणजे अधिकारिणी नव्हे. वन्य प्राणी संवर्धन कायद्याखाली अशा गोष्टींसाठी अधिकारिणी नेमलेली आहे. त्यावर अनेक सदस्य असतात.

 

टॅग्स :goaगोवा