शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2024 14:05 IST

शिवरायांमुळे अनेक मंदिरे वाचली

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली, धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनी पोर्तुगीजांना रोखले, असे उद्‌गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले. येथील शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी झाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती, धर्मांना घेऊन पुढे गेले. त्यांची प्रत्येक कृती आचरणात आणण्यासारखी आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. शिवाजी महाराज त्याकाळी गोव्यात आले नसते तर उरलेली मंदिरेही उद्ध्वस्त झाली असती. सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले नार्वे येथील सप्तकोश्वर मंदिर पुन्हा बांधले आणि पोर्तुगीजांना यापुढे धर्मपरिवर्तन तसेच मंदिरे उद्ध्वस्त करता येणार नाहीत, असे खडसावून सांगितले. त्यामुळेच आमची मंदिरे वाचली.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छिमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार कार्लस फेरेरा, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सरपंच स्वप्निल चोडणकर, सोनिया पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर, तिन्ही पंचायतीचे उपसरपंच, पंच सदस्य, पर्यटन खात्याचे संचालक सुनील आंचिपाका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रामलल्ला अयोध्येतील मंदिरात कधी विराजमान होणार, याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती. लोकांच्या इच्छेनुसार रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीतून विकसित भारत २०४७ पाहण्यासाठी आजचा युवक साक्षीदार होणार आहेत. नवभारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिवशाही, शिवराज्य आणि रामराज्य आणण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी खासदार तानावडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सरपंच चोडणकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवशाहीर नंदेश उमप, मूर्तिकार प्रशांत खेडेकर आणि जोसेफ लोपीस यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवशाहीर नंदेश आणि साथी कलाकारांनी शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. अनावरण सोहळ्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. मिरवणुकीत पर्वरीवासीयांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतShivjayantiशिवजयंती