शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2024 14:05 IST

शिवरायांमुळे अनेक मंदिरे वाचली

लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली, धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनी पोर्तुगीजांना रोखले, असे उद्‌गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले. येथील शिवजयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी झाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती, धर्मांना घेऊन पुढे गेले. त्यांची प्रत्येक कृती आचरणात आणण्यासारखी आहे. गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. शिवाजी महाराज त्याकाळी गोव्यात आले नसते तर उरलेली मंदिरेही उद्ध्वस्त झाली असती. सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले नार्वे येथील सप्तकोश्वर मंदिर पुन्हा बांधले आणि पोर्तुगीजांना यापुढे धर्मपरिवर्तन तसेच मंदिरे उद्ध्वस्त करता येणार नाहीत, असे खडसावून सांगितले. त्यामुळेच आमची मंदिरे वाचली.

यावेळी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छिमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार कार्लस फेरेरा, दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सरपंच स्वप्निल चोडणकर, सोनिया पेडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य कविता नाईक, पर्वरी भाजप मंडळाचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर, तिन्ही पंचायतीचे उपसरपंच, पंच सदस्य, पर्यटन खात्याचे संचालक सुनील आंचिपाका आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रामलल्ला अयोध्येतील मंदिरात कधी विराजमान होणार, याची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती. लोकांच्या इच्छेनुसार रामलल्ला मंदिरात विराजमान झाले आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीतून विकसित भारत २०४७ पाहण्यासाठी आजचा युवक साक्षीदार होणार आहेत. नवभारत, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने शिवशाही, शिवराज्य आणि रामराज्य आणण्यासाठी लोकांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी खासदार तानावडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सरपंच चोडणकर यांनी स्वागत केले. यावेळी शिवशाहीर नंदेश उमप, मूर्तिकार प्रशांत खेडेकर आणि जोसेफ लोपीस यांचा मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवशाहीर नंदेश आणि साथी कलाकारांनी शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रम सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. अनावरण सोहळ्यापूर्वी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. मिरवणुकीत पर्वरीवासीयांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतShivjayantiशिवजयंती