शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

आयटी धोरण मार्चपूर्वी, तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांची माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 9:33 PM

खाण व्यवसाय संकटात आल्यानंतर राज्याचा आर्थिक विकास दर एकदम घसरला. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला, त्यामुळे सरकारने गोव्याला पर्यटनाबरोबरच राज्य माहिती-तंत्रज्ञानाचे हब बनविण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत.

पणजी : खाण व्यवसाय संकटात आल्यानंतर राज्याचा आर्थिक विकास दर एकदम घसरला. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला, त्यामुळे सरकारने गोव्याला पर्यटनाबरोबरच राज्य माहिती-तंत्रज्ञानाचे हब बनविण्याच्यादृष्टीने पावले उचलली आहेत. येत्या 31 मार्चपूर्वी पूर्ण दर्जाचे आयटी धोरण जाहीर होईल, अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी दिली. 

बांबोळी येथील शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये सुरू झालेल्या ‘गोवा बिझ फेस्ट 2018’च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खंवटे बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. प्रमोद सावंत होते. तर व्यासपीठावर मजूर आणि रोजगार खात्याचे आयुक्त गोपाल पार्सेकर, एचसीएलचे संस्थापक सदस्य पद्मभूषण अजय चौधरी, गोवा उद्योग संघटनेचे अध्यक्ष राजकुमार कामत, सदाशिव सिरसाट यांची उपस्थिती होती. 

खंवटे म्हणाले की, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचा खाणींविषयी निवाडा आला. त्यामुळे आज असंख्य लोक सकाळपासून त्यावर चर्चा करीत असणार आहे, हे नक्की. प्रत्येक आव्हानामागे एक संधी लपलेली असते, असे आपणास वाटते. त्यामुळे ही संधी कशी साधायची हे आपणास जमले पाहिजे. मागील काही वर्षात खनिज खाणी सुरू होत्या तेव्हा राज्याचा आर्थिक विकास दर सर्वात मोठा होता. आता खाणींपासूनचा विकास दर 1 टक्क्यांवर आला आहे. अशा काळात राज्याला पुढे कसे नेता येईल, याविषयी सरकार गंभीर आहे. आजच्या युवा वर्गाला सरकार सर्वकाही देईल, असे वाटते. पण लोकशाहीत आपलेही कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी ठेवणो गरजेचे आहे. 

प्रत्येक राज्य हे आपल्याला आवश्यक आहे, अशा पद्धतीने धोरणांची आखणी करते. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दृष्टीने गोवा हे फार छोटे राज्य आहे. राज्याने सध्या पर्यटनावर आणि माहिती तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केले आहे. र्सवकष माहिती-तंत्रज्ञान (आयटी) धोरणावर गेल्या नऊ महिन्यांपासून काम सुरू आहे. राज्याचे प्रत्येक धोरण हे मजबूत असावे, यादृष्टीने ती आखली जात आहेत. आयटी, स्टार्ट अप धोरण पुढे कसे जाईल याविषयी तज्ञांची मते घेतली जात आहेत. गोव्याचे स्टार्ट अप हे देशातील एक उत्कृष्ट धोरण आहे. आयटी धोरण केवळ जाहीर करून चालणार नाही, तर ते यशस्वी झाले पाहिजे, त्याचबरोबर या धोरणाचा राज्य सरकारलाही कमीतकमी फायदा झाला पाहिजे, असे खंवटे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अशा धोरणामुळे नवोदित कामगार वर्गाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी सरकार योग्य मार्ग शोधत आहे. राज्यात युवा वर्गाचे डोळे लागलेले आयटी धोरण हे 31 मार्चपूर्वी जाहीर केले जाईल. केवळ आयटी धोरण जाहीर होणार नाही, तर या धोरणात केवळ नोक-यांचा विचार केला नाही, तर राज्यात गुंतवणूक वाढावी, परदेशात गेलेले युवक पुन्हा राज्यात यावेत, त्याचबरोबर पर्यावरणासही त्याचा फायदा व्हावा, यादृष्टीने हे धोरण आखले गेले आहे. गोवा हे माहिती तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी हब म्हणून ओळखले जावे. पर्यावरणपूरक उद्योग यात यावेत, असंख्य नोक:या निर्माण व्हाव्यात, हा या धोरणामागील उद्देश आहे. 

चौधरी यांनी एचसीएल कंपनीच्या उभारणीपासून संगणक क्षेत्रत होत असलेल्या बदलावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. सिरसाट यांनी आभार मानले. 

टॅग्स :goaगोवा