शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची वेळ आलीय: मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 08:27 IST

काही सहकारी मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांना साथ मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: मंत्रिपद मिळवण्यासाठी कोणतीही पूर्वअट किंवा अपेक्षा बाळगून आम्ही भाजपात सामील झालो नाही. ज्यांना पदे मिळायची होती त्यांना ती प्राप्त झाली. असे असले तरी सरकारमधील काही मंत्री चांगले काम करतात आहेत, तर काहीजण कामच करीत नाहीत. अशावेळी मंत्रिमंडळात फेरबदल किंवा खात्यांची फेररचना करण्याची गरज असल्याचे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

दोन दिवसांपूर्वी केदार नाईक यांनी लोबोंची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याची मागणी केली होती. या मागणीचे डिलायला लोबो यांनी समर्थन केले होते. या पार्श्वभूमीवर लोबोंनी सरकारपुढे मंत्रिमंडळ बदल करण्याची गरज असल्याचा एक प्रकारे प्रस्तावच मांडला आहे. राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलावरुन वारंवार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार मायकल लोबो हे फेरबदलाच्या मुद्द्यावरुन सतत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

मंत्रिमंडळात फेरबदल करावा किंवा नाही, हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा तसेच पक्षाचा आहे. सरकारकडून जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत पण लोकांची कामे वेळेवर पूर्ण होत नसल्याने त्यांचा अपेक्षाभंग होऊ लागला आहे. कामे पूर्ण करुन घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी किमान काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल करावे, असेही लोबो म्हणाले. हे मंत्री कोण त्याबाबत आपण भाष्य करणार नसल्याचेही लोबोंनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात पण त्यांना मंत्रीमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांकडून अपेक्षेनुसार सहकार्य लाभत नसल्याचे लोबो म्हणाले.

विरोधी पक्षात पोकळी; आवाज उठवतच नाहीत

यावेळी आमदार मायकल लोबो यांनी विरोधी पक्षांवरही टीका केली. आपण विरोधी पक्षात असताना गोमंतकीयांच्या हिताचे प्रश्न घेऊन आवाज उठवत होतो. पण आता विरोधी पक्षात पोकळीक निर्माण झाली आहे. जर आज आपण विरोधात असतो तर अनेक मुद्दे उपस्थित केले असते. पण सध्या विरोधकांनी मुद्दे उपस्थित करणेच सोडून दिले असल्याचेही आमदार लोबो म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण