शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

गोव्यातील बंद खाणींचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात पुन्हा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:53 IST

सध्या गोव्यात जो खाण उद्योग बंद पडला आहे तो पुन्हा सुरू व्हावा यासाठी खाण पट्टय़ातील लोकांकडून दबाव वाढू लागला आहे.

मडगाव - सध्या गोव्यात जो खाण उद्योग बंद पडला आहे तो पुन्हा सुरू व्हावा यासाठी खाण पट्टय़ातील लोकांकडून दबाव वाढू लागला असून येत्या महिन्यापासून सुरु होणा-या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्याचे संकेत विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर  यांनी दिले आहेत.

गोव्यात बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू होण्याची गरज आहे आणि त्यासाठी गोवा सरकारने ठोस पाऊले उचलण्याची गरज कवळेकर यांनी व्यक्त केली असून येत्या पावसाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणू. स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी सूचना आदी माध्यमांतून हा प्रश्न विधानसभेच्या पटलावर आपण चर्चेला आणणार असे त्यांनी सांगितले.गुरुवारी खाण कामगारांनी कवळेकर यांची त्यांच्या बेतूल येथील निवासस्थानी भेट घेऊन खाण उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. अशीच मागणी आपण वीजमंत्री निलेश काब्राल तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडेही करु असे या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. किमान येत्या मोसमात तरी हा उद्योग सुरु व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोव्यातील सर्व खाणींची लिजेस गोठवण्यात आली असून त्यामुळे मागची काही वर्षे गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा खाण उद्योग बंद पडला आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या खाण पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर बेकारी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता खाण कामगारांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे.गोव्यातील खाणी सुरु व्हाव्यात यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आता ठोस प्रयत्न सरकारकडून होण्याची गरज आहे. आतार्पयत खाण अवलंबितांना सरकारकडून आश्वासनेच मिळालेली आहेत. आश्वासनांनी काम भागणार नाही. हा उद्योग नेमका कधी सुरु होणार हे आता सरकारने स्पष्ट करण्याची गरज आहे. खाण पट्टय़ातील आमदार असलेले प्रमोद सावंत हे आता मुख्यमंत्री झाले आहेत. तर निलेश काब्राल व दीपक पाऊसकर हे मंत्री आहेत. केंद्रातही भाजपाचे सरकार असल्याने गोवा सरकारकडून आता विषेश प्रयत्नाची गरज कवळेकर यांनी व्यक्त केली. जर गोवा सरकार पुन्हा एकदा सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांकडे घेऊन जात असेल तर त्यात सामील होण्याची आमची तयारी आहे. दिल्लीतूनही आमच्या पक्षाचा पाठिंबा गोव्यातील खाणी परत सुरु होण्यासाठी असेल असे कवळेकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा